Saturday, October 31, 2020

सायबर गुन्ह्याचा महिला आणि बालकांवरील विळखा

सायबर गुन्ह्याचा महिला आणि            बालकांवरील विळखा


सध्याच्या या कोरोना च्या काळात सायबर गुन्ह्यात बऱ्यापैकी वाढ झालेली आहे.कारण कोरोनामुळे सगळीच लोक ऑनलाईन व्यवहार करताना दिसतात आहे आणि सध्या घरातल्या घरात असल्यामुळे मनोरंजनाचे साधन म्हणून जास्तीत जास्त फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सॲप,ट्विटर चा वापर वाढल्यामुळे या सायबर गुन्हेगारांना आयतीच मेजवानी मिळते आहे.ते लोकांच्या मागावरच असल्याचे दिसते.सायबर गुन्हा हा फक्त व्यक्तीच नाही तर देशासाठी सुद्धा घातक झालाय आणि हा सायबर गुन्ह्याचा विळखा दिवसेंदिवस वाढतच चाललाय.सायबर गुन्हा काय आहे हे बऱ्याच लोकांना माहिती नाही.बरेच लोक यापासून अनभिद्य आहेत. मी माझ्या मागच्या "प्रसंगावधान"या लेखात थोडक्यात माहिती दिली होती पण आता सायबर गुन्ह्याचे किती प्रकार असतात ते पण थोडं सविस्तर सांगून लोकांना जागरुक करावं असं वाटतं.

                   इंटरनेटमुळे जग जोडले गेले आहे. सोशल मीडियामुळे जगाच्या कानाकोपऱ्यातील घडामोडी अवघ्या काही क्षणांत आपल्यापर्यंत पोहोचतात. आता हेच समाज माध्यम छळाचे अस्त्र बनू पाहत आहे. प्रामुख्याने याचा फटका तरुणी, महिला, बालक यांच्यासह पुरुषांनाही बसत आहे.सायबर गुन्हे हा दिवसेंदिवस चितेंचा विषय बनतो आहे. या क्षेत्राचा दैनंदिन जीवनात अधिक वापर होऊ लागल्याने रस्त्यावरील गुन्हेगार सायबर गुन्ह्यांकडे वळले आहे. समाज माध्यम म्हणजेच फेसबुक, व्हॉट्सॲप, इन्स्टाग्राम, ट्विटर ही तर गुन्हेगारांसाठी खुली मैदानेच ठरत आहेत. बॅंकिंग फसवणूक, विवाह जुळवणाऱ्या संकेतस्थळावरून फसवणुक करणे, फसवे ई-मेल पाठवणे या सर्व गुन्हयाबरोबरच एकंदर समाज माध्यम हे गुन्हेगारांचे अस्त्र बनत आहे. समाज माध्यमांपैकी व्हॉट्सॲप,इनस्टाग्राम आणि फेसबुकचा वापर अधिक प्रमाणात केल्या जात आहे.

जगातील लोकसंख्येच्या एक चतुर्थांश लोकसंख्येपेक्षा अधिक लोक समाज माध्यमांवर सध्या ॲक्टीव्ह आहेत. संभाषणाची सगळ्यात सोपी आणि तेवढीच गतीमान पद्धत म्हणून याकडे पाहले जाते. मात्र, जेथे जास्तजण तेथेच गुन्हेगारही आपले बस्तान बसवितात. अगदी तसाच प्रकार सायबर जगातही झाला आहे. सायबर हॅकर (गुन्हेगार) यांनी विविध माध्यमातून सर्वसामान्यांना त्रास देणे, फसवणूक करणे, बदनामी करणे यासह मुळ फोटो वा दस्ताऐवजात बदल करून हेच खरे आहे असे ठासून सांगून एकप्रकारे त्या व्यक्तीची नवीच छबी तयार करतात. सध्या हा प्रकार सर्रास वाढला आहे. 

आपण प्रथम सायबर गुन्हेगारीविषयी बोलू. याचा फटका अगदी सर्वसामान्य माणसापासून ते एखाद्या देशाच्या मोठ्या कंपनीला/बँकेला बसू शकतो. 

१) फिशिंग(phishing)

उदाहरणार्थ "फिशिंग" नावाचा एक गुन्हा इतक्या मोठ्या प्रमाणावर घडवला जातो की, खरे म्हणजे त्याविषयी इंटरनेटचा वापर करणाऱ्या सगळ्यांनाच माहिती असणे खूप गरजेचे आहे. पण तरीही सतत इंटरनेट नव्याने वापरायला सुरुवात करणारी निष्पाप माणसे या प्रकाराला सतत बळी पडतात. या प्रकारात इंटरनेटवरचे सायबर गुन्हेगार सर्वसामान्य लोकांना भुलवून, घाबरवून किंवा फसवून त्यांचे नुकसान करतात. त्यासाठी ते आधी आपल्याला एक घाबरवणारा किंवा भोवळघालणारा ई-मेल पाठवतात. उदाहरणार्थ त्या ई-मेलमध्ये ‘तुमच्या इंटरनेट बँकिंगचा पासवर्ड एका हल्लेखोराने मिळवला आहे ...त्यामुळे निर्माण झालेला धोका टाळण्यासाठी लगेच तुमचा पासवर्ड बदला...’ असे लिहिलेले असते. त्यासाठी या ई-मेलमध्ये एक ‘लिंक’ दिलेली असते. त्या लिंकवर आपल्या संगणकाचा माऊस नेऊन त्यावर क्लिक केले की आपल्यासमोर आपल्या बँकेची वेबसाइट उघडली जाते असे आपल्याला वाटते. खरे म्हणजे ही आपल्या बँकेची वेबसाइट नसतेच मुळी. ती तर त्या सायबर गुन्हेगाराने तयार केलेली स्वत:ची वेबसाइट असते. पण ती हुबेहूब आपल्या बँकेच्या वेबसाइटसारखी दिसत असल्यामुळे आपल्याला ती आपल्या बँकेचीच वाटते! तिथे "तुमचा पासवर्ड बदलण्यासाठी सध्याचा पासवर्ड भरा"वगैरे गोष्टी लिहिलेल्या असतात. आपल्याला सायबर गुन्हेगारांचे हे काम माहीत नसल्यामुळे आपण गुपचूप ही माहिती भरतो आणि आपल्याला जो नवीन, बदललेला पासवर्ड हवा आहे तोही तिथे टाइप करतो. मग "पासवर्ड" बदलल्यामुळे आता सगळे ठीकठाक आहे, धन्यवाद’ वगैरे गोष्टी आपल्याला आपल्या संगणकाच्या पडद्यावर दिसतात आणि आपल्याला हायसे वाटते. पण इथेच सगळा घोटाळा झालेला असतो. सायबर गुन्हेगारांने हा ई-मेल आपल्याला स्वत:च आपल्या बँकेच्या नावाने पाठवलेला असतो. त्यातही त्याने माहिती अशा प्रकारे लिहिलेली असते की, आपला त्यावर चटकन विश्वास बसतो. तसेच हा ई-मेल त्याने अगदी आपल्या बँकेचा वाटेल अशा ई-मेल आयडीवरून पाठवलेला असतो. त्यामुळे तो खरेच आपल्या बँकेकडून आलेला आहे, असे आपल्याला वाटते. तसेच त्या ई-मेलमध्ये त्या सायबर गुन्हेगारांनी दिलेली ‘लिंक’ आपल्याला आपल्या बँकेच्या वेबसाइटवर घेऊन जाते असे आपल्याला वाटत असले तरीही ती प्रत्यक्षात मात्र आपल्याला त्या सायबर गुन्हेगाराच्या बोगस वेबसाइटकडे नेत असते. मग तिथे आपण आपल्या बँकेचा युजर आयडी आणि पासवर्ड टाइप केला की, तो त्या सायबर गुन्हेगाराच्या हाती लागतो! मग तो सायबर गुन्हेगार ही माहिती वापरून स्वत: आपल्या बँकेच्या खऱ्या वेबसाइटवर जातो आणि तिथे आपल्याकडून मिळवलेला आपला खरा युजर आयडी आणि पासवर्ड वापरून आपल्या खात्यातले सगळे पैसे स्वत:च्या खात्यात  वळवतो.हा झाला सायबर गुन्ह्याचा एक प्रकार.

Phishing shall be punished with imprisonment upto 3 yrs and fine upto 1 lakh rupees.sec 66(D) information technology act.


२) चाईल्ड पोर्नोग्राफी( child pornography)

चाईल्ड पोर्नोग्राफीत भारत सर्वात अव्वल आहे.पॉर्न व्हिडिओ अपलोड करण्यात लहान आणि किशोरवयीन मुलांची संख्या अधिक असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामुळेच schoolgirls, teens आणि desi girls हे सर्वाधिक वापरले जाणारे key words आहेत.चाईल्ड पोर्नोग्राफी म्हणजे १८ वर्षाखालील बालकांवर होणारा लैगिंक अत्याचार आणि त्याचं चित्रीकरण करणे याला चाईल्ड पोर्नोग्राफी असे म्हणतात.खाऊ, खेळणी,मोबाईल गेम इत्यादींचे  आमिष दाखवून बालकांवर लैंगिक अत्याचार केले जातात.

Child pornography sec 67 (B)shall be punished on first conviction with imprisonment of either description for a term which may extend to five years and with a fine which may extend to ten lakh rupees and in the event of second or subsequent conviction with imprisonment of either description for a term which may extend to seven years and also with fine which may extend to ten lakh rupees:

३) सायबर ग्रुपिंग(cyber grooping)

समाज माध्यम किंवा मेसेजिंग प्लॅटफॉर्मद्वारे मुलांचं लैंगिक किंवा अन्य प्रकारे शोषण करण्याच्या उद्देशाने जवळीक निर्माण केली जाते.सायबर ग्रुमर भेटवस्तू,प्रशंसा,मॉडेलिंगमध्ये काम मिळवून देण्याचं आमिष देत जवळीक वाढवतात.पुढे अश्लील संदेश,छायाचित्र किंवा व्हिडीओ  पाठवू लागतात.पुढे आपले नुड्स फोटो,खाजगी फोटोसह व्हिडीओ पाठविण्यास सांगतात.आणि अशाप्रकारे ते लैंगिक शोषण करू शकतात.

Cyber grooping shall be punished with imprisonment for a term which may extend to three years, or with fine which may extend to one lakh rupees, or with both.sec 66 (B) Information technology act.

४) सायबरबुलिंग (cyberbullying)

स्त्रियांना, मुलींना धमकी देत त्यांना मानसिक त्रास दिला जातो.अश्लील किंवा हानिकारक संदेश,टिपण्या आणि व्हिडीओ पाठवून एखाद्याला त्रास देण्यासाठी इंटरनेट किंवा मोबाईल तंत्रज्ञानचा वापर केला जातो.सायबर गुन्हे करणारी व्यक्ती मजकूर,संदेश,ई-मेल,सोशल मीडिया, संकेतस्थळ, चॅट रूम्स इत्यादींचा वापर करतात.यामुळे गंभीर स्वरूपाचे भावनिक, शारीरिक,सामाजिक आणि मानसिक परिणाम जाणवतात.

Cyber bullying shall be punishable with imprisonment for a term which may extend to three years and with fine.section 66 -(A) of IT act.

५)  मॉर्फिंग(morphing)

सायबर मॉर्फिंग मध्ये एखाद्या  व्यक्तीचं मूळ छायाचित्र बदललं जातं.महिलांची किंवा तरुणींची छायाचित्र डाउनलोड करून,अवमानना होईल अशा प्रकाराने मॉर्फिंग करून ते पुन्हा वेबसाईटवर रिपोस्ट किंवा अपलोड करून बनावट प्रोफाईल बनविले जातात.

Morphing shall be punished on first conviction with imprisonment of either description for a term which may extend to three years and with fine which may extend to five lakh rupees and in the event of second or subsequent conviction with imprisonment of either description for a term which may extend to five years and also with fine which may extend to ten lakh rupees. only if you like it.(Section 67 in The Information Technology Act).

६) सायबर डिफेमेशन( cyber defamation)

चुकीचं विधान करून व्यक्तीच्या सामाजिक प्रतिष्ठेला हानी पोहचवीली जाते.चारित्र्य हननाच्या उद्देशाने ई - मेल किंवा समाजमाध्यमांवर पोस्ट टाकली जाते.

Cyber defamation sec 77(B)punishable with imprisonment of three years and above shall be cognizable and the offence punishable with imprisonment of three years shall be bailable.

७) सायबर स्टॉकिंग( cyber stalking)

एखाद्या व्यक्तीच्या ऑनलाईन हालचालींचा पाठलाग करणे,त्यांच्यावर सतत लक्ष ठेवणे आणि त्यांची वयक्तिक माहिती गोळा करून ती सोशल मीडियावर प्रसारित करणे.अशी संवेदनशील माहिती गोळा करून सायबर स्टाकर नाव,कौटुंबिक पार्श्वभूमी,आणि मोबाईल क्रमांकाच्या आधारे पीडितेच्या दैनंदिन व्यवहारात प्रवेश करतो.शिवाय पीडितेच्या नावाने  संबंधित वेबसाईटवर माहिती पोस्ट करतो.

Cyber stalking shall be punished with imprisonment for a term which may extend to two years, or with fine which may extend to one lakh rupees, or with both.(sec 72 of Information technology act)


८) ऑनलाईन गेमिंग(online gaming)

मुलं मोबाईल, संगणक,पोर्टेबल गेमिंग डिवाईसचा वापर करून सोशल नेटवर्क वर ऑनलाईन गेम खेळतात.उदाहरणार्थ:- ब्लू व्हेल, पब जी मात्र याच ऑनलाईन गेमिंग च्या अतिरेकापायी मुलं चोरी,आत्महत्या यासारख्या गुन्ह्यांना बळी पडतात.

समाज माध्यमांचा वापर करताना काळजी घेणे फार महत्त्वाचे आहे. विशेषकरून महिलांनी तर सावधगिरी बाळगली पाहिजेच. फोटो, माहिती, संपर्क क्रमांक, पत्ता यासारख्या वैयक्तिक बाबी शेअर करू नयेत. याच माहितीचा सायबर गुन्हेगार गैरफायदा घेतात आणि त्याआधारे महिलांना फसवले जाते किंवा त्यांचा छळ केला जातो.समाज माध्यमांचा अशाप्रकारे गैरवापर केल्या जाऊ शकतो.

- प्रेमास नकार दिल्यामुळे बदनामी 

- लग्नाचे आमिष देऊन फसवणूक 

- चित्रफीत, फोटो व्हायरल करून ब्लॅकमेल 

- भांडणाचा बदला घेण्यासाठी अपप्रचार 

- अश्लील फोटो, व्हिडीओ व्हायरल 

- फोटोमध्ये छेडछाड करून दुरूपयोग. 

अशाप्रकारे समज माध्यमांचा दुरुपयोग होऊ शकतो तर सावधान राहून समाज माध्यमांचा वापर करायला हवा तर त्यासाठी महिला, मुलं, पुरुष ह्यांनी खालील गोष्टी लक्षात ठेवायला हव्या:- 

- अनोळखी व्यक्तीला 'फ्रेंड रिक्वेस्ट' पाठवू नका अथवा स्वीकारू नका.

- समाज माध्यमांवर फोटो, व्हिडीओ सर्वांनाच दिसतील, असे ठेऊ नका. 

- महिलांनी संपर्क, पत्ता तसेच इतर वैयक्तिक माहिती टाळावी.

- व्हॉट्सॲपवर डीपी, स्टेटस ठेवताना जपून ठेवा.

- सायबर कॅफेमधून समाज माध्यमांचा वापर करताना विशेष काळजी घेणे  आवश्यक आहे.

- आयडी, पासवर्ड कुणी पाहणार नाही, याची खबरदारी घ्या .

अशाप्रकारे आपण सावध राहिलो तर आपल्याला कुणी फसविण्याचा प्रयत्न करणार नाही आणि हा सायबर गुन्ह्याचा विळखा जो आहे तो आपोआप सुटेल.चला तर मग सावधगिरीने आपण आपले सगळे व्यवहार करूया.


ऍड.क्षमा आशिष धर्मपुरीवार(बासरकर)

बा. क.स.अध्यक्ष चंद्रपूर 

८४८४०८२२२४












माझ्या माहेरचे अंगण




 बघा आवडतंय काय 👇           


                  माझ्या माहेरचं अंगण


कोरोना कोरोना कोरोना खरंच त्रासलेत सगळे हया कोरोना मुळे. किती तो त्रास बरं लहान मुलांपासनं तर मोठ्यांपर्यत सगळ्यांनाच त्याच्या मुळे त्रास होतोय पण तो मात्र कमी व्हायचं नावच घेत नाही आहे दिवसागणिक तो वाढतोच आहे.गरीबापासून तर श्रीमंतापर्यंत सगळ्यांनाच त्याने वेठीस धरून ठेवलंय,त्याने कोणालाही कुठलेही सण देखील साजरे करू दिले नाही म्हणजे तो(कोरोना)कितीही वाईट असला ना तरी काही बाबतीत या समाजाला चांगलाच धडा शिवून गेलाय असे म्हणता येईल,खरंच सर्व धर्म समभाव ठेवायला हवा भेद भाव करू नये तेच इथे घडताना दिसतंय, राजकीय पक्षातील लोक सुद्धा या अश्या परिस्थितीत राजकारण सोडून बाकी सगळं विसरून आता लोकांनी लोकांसाठी कामाला/मदतीला यायला पाहिजे असे सांगू लागलेत.


खरं सांगायचं तर कोरोना हा तर डिसेंबर पासून सुरू झाला होता पण तेव्हा कुणालाही त्याच गांभीर्य इतकं कळलंच नसावं आणि कुणी त्याला इतकं गांभीर्याने घेतले पण नाही पण खरी सुरुवात झाली ती मार्च पासनंमुलांच्या परीक्षा जेमतेम सुरूच झाल्या होत्या की,अचानकपणे त्या कोरोनाच्या भीती पायी हळू हळू सगळं बंद बंद ची सुरुवात झाली.lockdown मुले शाळा तर बंद झाल्याचं पण अशी वेळ आली की, पेपर देखील मुलांचे रद्द करावे लागले.लहान मुलांचे ठीक आहे हो पण मोठ्या मुलांच्या जेव्हा परीक्षा रद्द झाल्या तेव्हा हुशार आणि टॉपर असलेल्या मुलांना जरा जडच गेलं ते,कारण जेमतेम पास होणारे मुलंही चांगले grade घेऊन पास झालेत पण असो जीवापुढे कुठे काय चालतं असं म्हणतात ना "सर सलामत तो पगडी पचास",तसच झालं ते,माणूस चांगला राहिला तर कितीही परीक्षा देता येतील.


नवीन नवीन जेव्हा  lockdown सुरू झाले तेव्हा सगळ्यांनाच मस्त वाटायचे कारण सगळे जण आपापल्या घरी एकमेकांना वेळ देऊ लागले. नाहीतर आता पूर्वी सारखी एकत्र कुटुंब पद्धती राहिलीये तरी कुठे, असली तरी ती बोटांवर मोजण्या इतपतच कुटुंब तसे उरले असावेत पण या कोरोना मुळे म्हणा की, काय प्रत्येक जण घरात राहून वेळ देऊ लागला,आपले छंद जोपासू लागला असे बरेच काही करता यायला लागले,नवीन नवीन तर किती उत्साह होता सगळ्यांना, नवीन नवीन पदार्थ करणे, खाऊ घालणे त्याचे फोटो फेसबुक, wtsap स्टेटस वर share करणे असे बरेच काही सुरू होते,तसेच स्त्रियांना पण बराच उत्साह होता त्या पण वेगळे वेगळे व्हिडिओ तयार करून टाकणे असे सगळे सुरू होते,पण जसा जसा वेळ जायला लागला तसा तसा आता लोकांचा उत्साह कमी होत चाललाय आणि कोरून विषयीची भीती पण कमी होत चालली आहे.


या सगळ्या कोरोनाच्या प्रवाहात मुली-सुनांना यंदा  माहेरपण उपभोगायला मिळाले नाही.माहेरपण म्हटलं की सगळ्यांनाच एक वेगळा आनंद उत्साह असतो प्रत्येकच आजी-आजोबाला आपलं गोकुळ गजबजलेलं असावं असं वाटत राहतं.असाच एक संवाद आजी-आजोबा,आई- बाबा,सासुसासरे म्हणा सगळ्यांमध्येच होत असावा.आजकाल मूलं-सूना,जावई-मुलगी कितीही लांब राहत असले तरी वर्षातून एकदा किंवा सहा महिन्यातून एकदातरी आपल्या मूळ गावी आजोळी पंजोळी भेट देऊन आठ दिवस सासरी आणि आठ दिवस माहेरी येऊन मनसोक्त आनंद घेऊन त्या आठवणी आपल्या सोबत शिदोरी म्हणून घेऊन जातात नात्यांमधली मज्जाच काही और असते खरंय ना.तसाच एक माझ्या कल्पनेतील तो संवाद मला इथे सांगावासा वाटतोय.एका आई बाबांचा हा संवाद बघा अक्षरशः डोळ्यात पाणी आणतो की नाही.


आई म्हणते :- अहो,ऐकलं काय यंदा आपलं गोकुळ काही गजबजायचं नाही हो.

बाबा म्हणतात :- का गं असं का म्हणते आहेस.

आई म्हणते :- अहो,लेकरं येतात तेव्हा दरवर्षी  काय थाट असतो घराचा नाही का?

बाबा ऐकत असतात खिडकीबाहेर बघत...त्यांना तरी कुठं करमत होतं,ह्या कोरोनामुळे पोरी यंदा माहेरपणाला येऊ शकणार नाही हे स्पष्ट दिसत होतं मग बाबांनी आईला दिसणार नाही अशी हळूच मान वळवून त्यांनी चष्मा काढून डोळे पुसले आणि ते बडबडू लागले,ते ऐकताना आईच्या डोळ्यांची धार काही केल्या थांबत नव्हती.


        दरवर्षीच्या उन्हाळ्याची चाहूल आणि त्यात मुली/मुलं येणार असले की, मनाला  जो गारवा मिळतो तो औरच असतो,तिचं  येणं म्हणजे घरभर प्राजक्त होऊन दरवळण तिच्या लेकरांच्या किलबिलाटाने गजबजलेलं आपलं हे घरटं किती सुंदर वाटतं ते  सुंदर क्षण कसे धरून ठेवावे वाटतात पण ते क्षणही लगेच संपू लागतात.


चार दिवसांपासुन गजबजलेले घर एकदम शांत होऊ लागतं,ती येणार म्हणुन वाटेवर लागलेले आनंदी, उत्सुक डोळे आज सतत ती जाणार म्हणुन भरून येत असतात,हात, पाय ,मन कोणीच कामं करायला तयार नसतं,कारण आज त्या घरट्यातली पिल्लं पुन्हा आपल्या घरी निघणार असतात. ती थकलेली आई  हळूच स्वयंपाकघरात जाऊन पदराने डोळे पुसत तिच्यासाठी लोणचे,चटण्या,फराळाचे बांधुन तिच्या बॅगवर आणून ठेवत असते,बाबा येता जाता नातवंडांचे पसरलेले कपडे जमा करून बॅगवर आणुन टाकत असतात,मुलगी आपलं दोन दिवसात माहेरच्या अंगणात रेंगाळलेल मन गोळा करत असते. आणि म्हणूनच तिला तर काही सुचतच नसते,'चला उशीर नको व्हायला',या सुचना देखिल त्यांना ऐकून न ऐकल्यासारख्या वाटत असतात,आणि मग त्या अंगणातल्या परिजातकाकडून मग तुळशीच्या कानात आई बाबांच्या काळजीचं वचन घेऊन घरात येतात पोट भरावं म्हणून जेवणं होतात,आवडीची भाजी देखिल आज मन आनंदी करू शकत नाही,घड्याळ आज जास्तच वेगाने पुढं पळत असते असं त्यांना आणि त्यांच्याआईबाबांना पण वाटत असतं,आजोबांचं चारदा नातवंडांना गोंजारून झालं असतं,मामाची देखिल भरपूर मस्ती करून होते भाच्यांशी.


        तिला लग्नाच्या आधीच्या सगळ्या आठवणी डोळ्यात जमा व्हायला लागतात,आपल्या साठी आपल्या आई बाबांनी केलेले कष्ट आठवतात,तिला मनात वाटतं खरंच काय हि रीत लावली आहे समाजाने जिथे ज्या अंगणात मुली मोठया झाल्या तिथून एक दिवस जाऊन रुजावचं लागतं दुसऱ्याच्या अंगणात पण त्यामुळेच का होईना कदाचित हि रितच असावी आपली आणि आपल्यानंसाठी  ओढ निर्माण होण्यासाठी आणि म्हणूनच ओढ ही वाढत असावी,म्हणूनच आलं कि मन रेंगाळत,पाय निघत नाही माहेरहून आणि माहेरी यायचंय ह्या कल्पनेने,फुलपाखरू होऊन मन आधीच या अंगणात आनंदाने भिरभिरत राहतं, ती हरवते त्या आपल्या माहेरच्या सगळ्या आठवणीत.

शेवटी माहेरून सासरी निघण्याची ती वेळ येतेच,आई कुंकू लावून आपले अश्रू रोखत तिची ओटी भरते,बाबा नातवंडांना पैसे देऊन पापे घेऊन आपले अश्रू लपवत मुद्दाम बाहेर पडतात,ती पण आपलं रडणं रोखून ठेवते आणि उगाच करड्या आवाजात त्यांना एकमेकांची काळजी घ्यायला सांगते,गाडी नीघते एवढया वेळ लपलेले अश्रू टपकन ओघळायला लागतात,गाडी दिसेनाशी होई पर्यंत ह्या दोघांचे हात टाटा करत असतात,गाडीत मात्र क्षणात टचकन ओले झालेले डोळे परत सासरच्या वाटेवर धाव घेतात, माहेरची वाट तिला विसरावीच लागते कर्तव्यासाठी,आपलेपणासाठी लग्न झाल्यावर तीच आपली माणसं,तेच आपलं घर यासाठी.

  माहरेच्या वाटेवरचे हे डोळे मात्र कोरडे होतच नाहीत कारण ती आठवणींची ओल डोळ्यात कायम ठेऊन ते डोळे तसेच त्या माहेरवाशिणीच्या वाटेवर आस लावून बसतात पुन्हा तिच्या आठवणींची फुलं गोळा करायला..

असंच असत ना सगळं....

आईला ते सगळं ऐकून बोलता पण येत नाही पण तरीही आपला कठोर हा नवरा लेकीसाठी किती हळवा हे बघून ती सुखावते आणि रडतच म्हणते,

  " पण यंदा सगळ्या माहेरची अंगण सुनी सुनीच राहिली नाही का," आता मात्र ते दोघेही भरभरून रडून घेतात..तेवढ्यातच व्हिडिओ कॉल येतो,अर्थात तिचाच.......आणि ती त्यांना विचारते आई बाबा डोळे का असे पाणावलेत तुमचे?दोघेही लगेच म्हणतात तुझ्या आणि नातवंडाच्या आठवणीने गं..फोनवर दोन्ही बाजूने आता फक्त हुंदके ऐकू येत असतात.देश कितीही प्रगत झाला आणि कितीही इंटरनेट सुविधा असल्या तरी इंटरनेट  वरून आपण माहेरपण अनुभवू शकत नाही हेही तितकेच खरे,खरे की नाही तुम्हीच सांगा.


(आणि सगळेजनच मनोमन म्हणत असतात जा रे कोरोना लवकर निदान दिवाळीला तरी फुलवू दे माझ्या माहेरचं अंगण)


ऍड. सौ. क्षमा आ.बासरकर- धर्मपुरीवार

सदस्य, बाल न्यायमंडळ,चंद्रपूर.

फोन न.८४८४०८२२२४

Friday, October 30, 2020

"आत्मनिर्भर भारत"

                               "आत्मनिर्भर भारत"

आत्मनिर्भर म्हणजे काय?खरंय आजच्या युगात सगळ्यांनीच आत्मनिर्भर होणे ही जणू काळाचीच गरज झालेली आहे आत्मनिर्भर म्हणजे स्वयंपूर्ण किंवा सेल्फ reliant .आपल्या गरजा आपणच पुर्ण करायच्या असा याचा ढोबळमानाने अर्थ होतो. आत्मनिर्भर कोणी असायला हवे, फक्त पुरुषच आत्मनिर्भर होऊ शकतो काय?तर असा विचार करणेच चुकीचे आहे.कारण स्त्री आता बंदिनी राहिलेली नाही .

  महिला,नारी, स्त्री असे अनेक नावाने ओळखली जाणारी स्त्री तिला कधी जगात खूपच मान सन्मान दिल्या जातो तर कधी तिला अगदीच वाईट वागणूक दिली जाते हे आताचच नाही तर हे पूर्वीपासूनच चालत आलय ,पण काळ बदलला सावित्रीबाई फुले, रमाबाई रानडे, आनंदीबाई गोपाळ या सारख्या महिला समाज सुधारकांनी पुढारकार घेउन स्त्रीला तिच्या चूल आणि मूल या जगातून बाहेर काढले. शिक्षण देउन तिच्या हक्कांची जाणीव करून दिली. तिच्यात परिवर्तन घडवून आणले. त्यांनी केलेल्या महिला शिक्षण चळवळीचा स्त्रियांना फायदा झाला आणि महिला कर्तुत्ववान व कर्तबगार झाल्या. पण आता स्त्री शिकली,पूढे चालली तरी ही समाजात तिला म्हणावा तसा वाव मिळत नाही.तिला अजूनही अन्याय, अत्याचार आणि छळवणुकीला सामोरे जावंच लागतंय अजूनही स्त्री म्हणावी तितकी सुरक्षित नाहीये.

स्त्री ही शरीराने निर्मळ,बुद्धीमत्तेने हुशार तसेच सुसंकृत असायला हवी असे वंदनीय मावशींचे विचार होते आणि अश्याच व्यक्तिंमुळे भारत हा आत्मनिर्भर होऊ शकेल.

आपण आपली हिंदू जीवन शैलीचा अवलंब करणे आवश्यक आहे आपण स्त्रियांनी आपल्या कुटुंबात देखील त्याचा अवलंब करायला हवा जर आपणच त्याची सुरुवात केली तर आपण आत्मनिर्भर होऊ शकू आणि इतरांनाही आत्मनिर्भर होण्यास प्रोत्साहित होण्यास मदत करू शकू.

कुटुंब हा समाजातील एक महत्त्वाचा आणि आधारभूत असा प्राथमिक गट आहे. प्रेम, आपुलकी, त्याग, समान हितसंबंध जपण्याची ईर्षा,सहकार्य इ. कुटुंबजीवनातून निर्माण होणारे प्राथमिक भावबंध हे व्यापक समाजजीवनातही पाझरत जाऊन व्यक्त होतात. व्यक्तीच्या बालपणी सामाजिक, आर्थिक व सांस्कृतिक दृष्ट्या ती संपूर्णपणे कुटुंबाच्या आधीन असते. त्याचप्रमाणे समाजाच्या संस्कृतीचे कुटुंब हे एक प्रमुख वाहन असते. समाजाची मूल्ये, परंपरा, रीतीभाती व आचार ह्यांचा वारसा व्यक्तीला एका संस्कारक्षम अवस्थेत इतर संस्थांचा त्याच्या जीवनात प्रवेश होण्यापूर्वी कुटुंबाकडूनच मिळतो.म्हणूनच कुटुंबाचा विचार केल्याने जर कुटुंब स्वावलंबी बनले तर समाज स्वावलंबी बनेल, समाज स्वावलंबी बनला तर राष्ट्रही योग्य दिशेने स्वावलंबी बनेल.म्हणूनच व्यक्तीने जर चांगल्या विचारसरणीचा अवलंब करून आत्मनिर्भरतेकडे भर दिला तर आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी होऊन विकासाच्या दृष्टिकोनातून ते आवश्यक होईल.

तसेच कुटुंबामध्ये जर मुलांना कुटुंबातील व्यक्तिद्वारे ज्ञान वर्धक गोष्टींचे आदानप्रदान झाले आणि त्या पिढीवर जर चांगले संस्कार आणि चांगले शिक्षण दिल्या गेलेतर समाजामध्ये घडणाऱ्या विकृत मानसिकतेमध्ये त्याद्वारे बरेच बदल घडवून आणले जाऊ शकतात. जर पुढची पिढी किंवा समाज हा अशिक्षित आणि असंस्कारी राहिला तर बऱ्याच प्रमाणात विकृत मानसिकतेचे प्रकार वाढू शकतात आणि वाढतात सुद्धा आहेत.


 सध्या मनोरंजनाचे क्षेत्र आणि माध्यम हे मूळ विचारसरणीपासून दूर गेले आहेत आणि काही अश्शील मनोरंजनामुळे असले माध्यम हे समाज जागृत होण्याऐवजी विघातक प्रवृत्ती मध्ये वाढ होण्याकरिता कारणीभूत ठरत आहे.

देवीच्या नवरात्रात मुलींना देवीचे रूप मानून तिची पुजा केली जाते सवाष्ण स्त्रीला देवीचे रूप समजून तिची ओटी भरली जाते.पण मग ते तेवढ्यापुरतेच मर्यादित का असावे, आज स्त्री ही कुठल्याही क्षेत्रात कमी नाही पण तरीही स्त्रियांवरील अत्याचाराचे प्रमाण काही केल्या कमी होत नाही.म्हणजे आज एक बलात्काराची बातमी कानावर पडली की लगेच दोन दिवसांनी दुसरी बलात्काराची बातमी कानावर पडते. अशा विघातक विकृतीने स्त्रियांना खेळणे बनवून ठेवलंय. आताच्याच दोन ताज्या घटना घडल्या आहेत एक म्हणजे हाथरस चे आणि दुसरे हरियाणा येथील निकिता तोमर हिचे प्रकरण. काय चूक होती त्या मुलींची त्यानी कधी असा विचार ही केला नसावा की,त्यांच्या सोबत असे काही भयावह घडू शकेल.त्या निकिता चे तर IAS होण्याचे स्वप्न होते पण तिचे स्वप्न स्वप्नच राहिले, असे स्त्रिया किंवा मुली कुठेतरी काही उंच झेप घेण्याच्या आधीच त्यांचे पंख असे छाटल्या जातात. म्हणूनच स्त्रियांनी कमजोर होता कामा नये.तसेच मुली असो वा मुले त्यांनी त्यांच्या सोबत घडणारी प्रत्येक गोष्ट ही कुटूंबातील मोठ्यानं सांगायला हवी जेणेकरून हे असले अनुचित प्रकारांवर आळा घालता येईल.म्हणूनच स्त्री शिकायला हवी ती शिकली तर ती संपुर्ण कुटुंबाला सुशिक्षित आणि सुसंस्कारीत करू शकते आणि मुलांवर चांगले संस्कार झालेत तर नक्कीच अशा विघातक प्रवृत्तीवर आळा बसेल.वेळ पडलीच तर स्त्री ही दुर्गा आणि चंडिकेचे रूपही घेऊ शकते त्यामुळे स्त्रीला कधीही कमजोर समजू नये.

आजच्या या कोरोनाच्या संकट समयी आपल्या भारत देशाला एक चांगली संधी मिळाली आहे ती म्हणजे स्वदेशी बद्दल जागरूकता करण्याची.आज बरेच लोकांनी आत्मनिर्भर होण्याची आणि स्वदेशीचा अवलंब करण्याची चांगली संधी चालून आलेली आहे त्या संधीचे सोने करायला काय हरकत आहे.म्हणूनच विदेशी वस्तू न वापरता स्वदेशि वस्तुच वापरणे म्हणजे स्वतःच्या देशाचा अभिमान बाळगणे होय.स्वदेशीचा पुरस्कार करणे ही काळाची गरज झालेली आहे म्हणूनच जात जात आत्मनिर्भर भारत वर एक कविता म्हणावीशी वाटते.


सोने की चिड़िया था मेरा देश

लूट कर ले गए, बना कर अलग अलग भेष

संस्कृति हमारी पुरानी सबसे

मिल जाते इसके बहुत अवशेष

जबरजस्ती सब थोप दिया

भोला मानुष करता भी तो क्या

विदेशी चीजों से घिर गया भारत

अस्त व्यस्त इस्तेमाल से मरता भी तो क्या

समय आ गया है परिवर्तन का

स्वदेशी उत्पाद के समर्थन का

विश्व में भारत का भौकाल होगा

हर कोई अब यहां खुशहाल होगा

हर घर में मेक इन इंडिया

का सपना अब सब है देख रहे

आत्मनिर्भर अब बनेगा भारत

कट विदेशी चीजों के अब हैं पेच रहे

आत्मनिर्भर बनेगा भारत खुद के बने हथियारों से

आत्मनिर्भर बनेगा भारत मेलजोल के भाईचारों से

आत्मनिर्भर बनेगा भारत खुद के ही विचारों से

आत्मनिर्भर बनेगा भारत खुद के ही आविष्कारों से

न सरहद पर लड़ने जाना 

ना ही कोई खून बहाना 

आत्मनिर्भर हो मेरा वतन

मुझे स्वदेशी है अपनाना 

आत्मनिर्भर हो मेरा वतन.

ऍड. सौ. क्षमा आ.बासरकर-धर्मपुरीवार.

सदस्य, बाल न्यायमंडळ, चंद्रपूर.

फो न.८४८४०८२२२४


व्हॅलेन्टाईन्स आठवडा की सप्तपदी

  Valentine's week or saptpadi    व्हॅलेन्टाईन्स आठवडा की सप्तपदी मी हा जो लेख  लिहिलाय हे माझे व्यक्तिगत/वयक्तिक मत आहे त्यामुळे कुणाला...