अनुकरण
माझे लिहिलेले किती जणांना पटेल मला माहिती नाही.पण आता जो ट्रेंड चाललाय ना पुष्पा चा ते पाहून खरंच लिहावेसे वाटले आणि अजून एक निमित्य आहे ते म्हणजे एका भव्य दिव्य अशा व्यक्तीमत्वाची जयंती.......छत्रपती शिवाजी महाराज...... हे नाव जरी घेतलं तरी आपली छाती अभिमानाने फुलून येते. शिवाजी महाराज हे प्रत्येक मराठी माणसाचे दैवत आहे, असं म्हटलं तर नक्कीच वावगं ठरणार नाही.शिवाजी महाराज नाव घेतल्यावर आपोआपच अभिमान जागृत होतो.असे आपल्या सगळ्यांचे लाडके असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती. सर्वप्रथम त्यांना नमन🙏
अरे काय चाललंय...... तरुण.... तरुणाई आपल्या देशाचे भविष्य....पुढची पिढी.... असे म्हणवणारी आपली पिढी, आपली तरुणाई कुठल्या दिशेला चाललीये याचा कुणाला अंदाजही नसेल.सध्या तर सगळी तरुणाई ही पुष्पा फिल्म च्या संवादाने आणि त्यातल्या गाण्याने तरुणवर्ग वेडावलाय.पुष्पा चा समाज माध्यमांवरचा प्रभाव अतिरेकी आहे.किती...........किती अनुकरण करायचे आणि कुठल्या गोष्टीचे अनुकरण करायचे याचं भान तरुणाईने ठेवायला हवे.सगळीच मुलं मुली तशी नसली तरी 100% पैकी 50% मुलं मुली अश्या गोष्टीचं अनुकरण करतात.
पुष्पा हा चित्रपट अवैधरित्या चंदन तस्करी करणाऱ्या एका व्यक्तीवर वर आधारित आहे.कोण कुठला तो पुष्पा जो बेकायदेशीर रीत्या लाल चंदनाची तस्करी करतो.त्यानं त्या चित्रपटात दाखविलेला अविर्भावाचे आपल्या तरुणाई ला वेड लावून जातो.सगळी तरुण पोरं त्या पुष्पा चे आणि मुली श्रीवल्ली चे अनुकरण करतायेत उद्या तरुण मुलं पोलिसांवर गोळ्या झाडतील,कायदा आणि सुव्यवस्थेच्या पार चिंध्या उडवतील.स्मगलर आणि दलाल तरुणाईचे आदर्श होतील,आणि असे अनुकरण करणारे आपल्या जीवनाचे तीनतेरा वाजवतील,आदर्श जीवन जगणारे हद्दपार होतील.
अरे अनुकरण कुणाचं करावं याचं भान तरुणाईने राखलं पाहिजे,आज समाज माध्यमांवर जे ट्रेंड सुरू असेल त्याचे अनुकरण सध्याची तरुणाई करते, तरुणच नव्हे तर काल-परवा तर एक 2 वर्षाचं बाळ tv समोर उभा राहून पुष्पा च्या गाण्यावर नाचत होता, नाचणे, अभिनय हे आपले कला गुणचं आहेत मुलांना शिकवताना पण त्यांच्या आईबाबांनी आदर्श व्यक्तींची उदाहरणं देऊन त्यांचे अनुकरण करा असे मुलांना सांगितले पाहिजे.पण...........पण तरुणाई असल्या लोकांचे(स्मगलर,गुंड) लोकांचे अनुकरण करते तसे न करता तरुणाईने छत्रपती शिवाजी महाराज यांना आदर्श मानले पाहिजे,भगतसिंग यांना आदर्श मानले पाहिजे.तरुणांनी आपले आदर्श आणि चारित्र्य जपले पाहिजे.शिवरायांनी या मातीला स्वाभिमानानं जगण्याची शिकवण दिली.शिस्तबद्धता,वेळेचे महत्व, संघटन कौशल्य ह्या सगळ्या गोष्टी आताच्या तरुण तरुणीनं मध्ये असायला हवे.समोर काहीतरी करण्याची जिद्द असायला पाहिजे.जसे माँ जिजाऊंनी शिवबा ला संस्कार दिलेत,त्यांनी शिवबांना परस्त्री ही मातेसमान असते अशी शिकवण त्यांच्या मनात रुजविली, त्यांना घडविले, तसेच संस्कार सगळ्याच पालकांनी आपल्या मुलांमध्ये रुजवायला हवे, जेणे करून समाजात महिलांवर होणाऱ्या अत्याचाराला आळा बसेल.महिलांचा सन्मान करायला तरुण शिकतील. म्हणुनच अनुकरण करायचेच असेल तर थोर पुरुषांचे करा जेणेकरून आपल्या देशाला एक चांगली आणि जबाबदार युवा पिढी लाभेल.
सह्याद्री च्या छाताडातुन नाद भवानी गाजे,
काळजात राहती आमुच्या, रक्तात वाहती राजे,
तुफान गर्जतो,आग ओकतो!
वाघ मराठी माझा!
सन्मान राखतो,जान झोकतो
तुफान मातीचा राजा!
"ताजमहाल अगर प्रेम की निशानी है"
"तो शिवनेरी किल्ला एक शेर की कहानी है"
श्री. छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त त्यांना मानाचा मुजरा
युगप्रवर्तक, स्वराज्यसंस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, शिवजन्मोत्सवा निमित्त छत्रपतींना मानाचा मुजरा व सर्व शिवप्रेमींना हार्दिक शुभेच्छा #शिवजन्मोत्सव, #जय_शिवराय 🙏🙏
🚩🚩 🙏🙏🙏🙏🚩🚩
ऍड क्षमा आशिष धर्मपुरीवार(बासरकर)
सदस्य, बाल न्याय मंडळ, चंद्रपूर.
८४८४०८२२२४.