Friday, February 18, 2022

अनुकरण

                                          अनुकरण

माझे लिहिलेले किती जणांना पटेल मला माहिती नाही.पण आता जो ट्रेंड चाललाय ना पुष्पा चा ते पाहून खरंच लिहावेसे वाटले आणि अजून एक निमित्य आहे ते म्हणजे एका भव्य दिव्य अशा व्यक्तीमत्वाची जयंती.......छत्रपती शिवाजी महाराज...... हे नाव जरी घेतलं तरी आपली छाती अभिमानाने फुलून येते. शिवाजी महाराज हे प्रत्येक मराठी माणसाचे दैवत आहे, असं म्हटलं तर नक्कीच वावगं ठरणार नाही.शिवाजी महाराज नाव घेतल्यावर आपोआपच अभिमान जागृत होतो.असे आपल्या सगळ्यांचे लाडके असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती. सर्वप्रथम त्यांना नमन🙏

अरे काय चाललंय...... तरुण.... तरुणाई आपल्या देशाचे भविष्य....पुढची पिढी.... असे म्हणवणारी आपली पिढी, आपली तरुणाई कुठल्या दिशेला चाललीये याचा कुणाला अंदाजही नसेल.सध्या तर सगळी तरुणाई ही पुष्पा फिल्म च्या संवादाने आणि त्यातल्या गाण्याने तरुणवर्ग वेडावलाय.पुष्पा चा समाज माध्यमांवरचा प्रभाव अतिरेकी आहे.किती...........किती अनुकरण करायचे आणि कुठल्या गोष्टीचे अनुकरण करायचे याचं भान तरुणाईने ठेवायला हवे.सगळीच मुलं मुली तशी नसली तरी 100% पैकी 50% मुलं मुली अश्या गोष्टीचं अनुकरण करतात.

पुष्पा हा चित्रपट अवैधरित्या चंदन तस्करी करणाऱ्या एका व्यक्तीवर वर आधारित आहे.कोण कुठला तो पुष्पा जो बेकायदेशीर रीत्या लाल चंदनाची तस्करी करतो.त्यानं त्या चित्रपटात दाखविलेला अविर्भावाचे आपल्या  तरुणाई ला वेड लावून जातो.सगळी तरुण पोरं त्या पुष्पा चे आणि मुली श्रीवल्ली चे अनुकरण करतायेत उद्या तरुण मुलं पोलिसांवर गोळ्या झाडतील,कायदा आणि सुव्यवस्थेच्या  पार चिंध्या उडवतील.स्मगलर आणि दलाल तरुणाईचे आदर्श होतील,आणि असे अनुकरण करणारे आपल्या जीवनाचे तीनतेरा वाजवतील,आदर्श जीवन जगणारे हद्दपार होतील.

      अरे अनुकरण कुणाचं करावं याचं भान तरुणाईने राखलं पाहिजे,आज समाज माध्यमांवर जे ट्रेंड सुरू असेल त्याचे अनुकरण सध्याची तरुणाई करते, तरुणच नव्हे तर काल-परवा तर एक 2 वर्षाचं बाळ tv समोर उभा राहून पुष्पा च्या गाण्यावर नाचत होता, नाचणे, अभिनय हे आपले कला गुणचं आहेत मुलांना शिकवताना पण त्यांच्या आईबाबांनी आदर्श व्यक्तींची उदाहरणं देऊन त्यांचे अनुकरण करा असे मुलांना सांगितले पाहिजे.पण...........पण तरुणाई असल्या लोकांचे(स्मगलर,गुंड) लोकांचे अनुकरण करते तसे न करता तरुणाईने छत्रपती शिवाजी महाराज यांना आदर्श मानले पाहिजे,भगतसिंग यांना आदर्श मानले पाहिजे.तरुणांनी आपले आदर्श आणि चारित्र्य जपले पाहिजे.शिवरायांनी या मातीला स्वाभिमानानं जगण्याची शिकवण दिली.शिस्तबद्धता,वेळेचे महत्व, संघटन कौशल्य ह्या सगळ्या गोष्टी आताच्या तरुण तरुणीनं मध्ये असायला हवे.समोर काहीतरी करण्याची जिद्द असायला पाहिजे.जसे माँ जिजाऊंनी शिवबा ला संस्कार दिलेत,त्यांनी शिवबांना परस्त्री ही मातेसमान असते अशी शिकवण त्यांच्या मनात रुजविली, त्यांना घडविले, तसेच  संस्कार सगळ्याच पालकांनी आपल्या मुलांमध्ये रुजवायला हवे, जेणे करून समाजात महिलांवर होणाऱ्या अत्याचाराला आळा बसेल.महिलांचा सन्मान करायला तरुण शिकतील. म्हणुनच अनुकरण करायचेच असेल तर थोर पुरुषांचे करा जेणेकरून आपल्या देशाला एक चांगली आणि जबाबदार युवा पिढी लाभेल.

                            सह्याद्री च्या छाताडातुन नाद भवानी गाजे,

                          काळजात राहती आमुच्या, रक्तात वाहती राजे,

                                      तुफान गर्जतो,आग ओकतो!

                                              वाघ मराठी माझा!

                                      सन्मान राखतो,जान झोकतो

                                         तुफान मातीचा राजा!

                               "ताजमहाल अगर प्रेम की निशानी है"

                           "तो शिवनेरी किल्ला एक शेर की कहानी है"

  श्री. छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त त्यांना मानाचा मुजरा


युगप्रवर्तक, स्वराज्यसंस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, शिवजन्मोत्सवा निमित्त छत्रपतींना मानाचा मुजरा व सर्व शिवप्रेमींना हार्दिक शुभेच्छा #शिवजन्मोत्सव, #जय_शिवराय 🙏🙏

                                        🚩🚩  🙏🙏🙏🙏🚩🚩


ऍड क्षमा आशिष धर्मपुरीवार(बासरकर)

सदस्य, बाल न्याय मंडळ, चंद्रपूर.

८४८४०८२२२४.

Saturday, February 12, 2022

Outlet (expressing emotions)- अभिव्यक्ती

 Outlet (expressing emotions)- अभिव्यक्ती


Outlet आउटलेट म्हणजे अभिव्यक्ती.अभिव्यक्ती म्हणजे विचारांचे प्रकाशन. मनमोकळेपणाने व्यक्त होणे.याद्वारे माणूस आपल्या भावनांना प्रकाश देतो आणि त्याच्या भावनांना रूप देतो पण जर या भावना स्त्री/पुरुष/लहान मुलं/तरुण मुले -मुली व्यक्त करत नसतील तर त्याचे काय परिणाम होऊ शकतात ह्याचा कुणी विचार केलाय काय? म्हणून व्यक्त होणं किती गरजेचं असतं ! मानसशास्त्रज्ञांनी व्यक्तिमत्त्वाच्या समायोजनासाठी अभिव्यक्ती हे मुख्य साधन मानले आहे. 


Outlet हे मनुष्याच्या जीवनात किती महत्वाचा आहे,प्रत्येकच व्यक्तीला outlet असणं गरजेचे आहे कारण माणूस वर वर दिसतो तितका आतून खंबीर असेलच असे नाही.त्याच्या मनात वेगळीच खळबळ असू शकते, जी आपल्यापर्यंत पोचत नसते किंवा तो/ती आनंदी आणि हसऱ्या चेहऱ्याच्या आड लपविण्याचा प्रयत्न करीत असतो.म्हणूनच माणसाच्या मनाला outlet असायलाच हवे.


आज प्रत्येकाचे जीवन धकाधकीचं झालंय आणि अश्या ह्या धकाधकीच्या जीवनात कुणाकडेच व्यक्त होण्यासाठी वेळ नाही.त्यातल्या त्यात मोबाईल मुळे प्रत्येकांच्या मधला संवाद कमी झालाय, मग त्यात लहान मूलं असो की,मोठी व्यक्ती असो प्रत्येकांमधला संवाद कमी झाल्यामुळे कुणाला व्यक्त व्हावे वाटले तरी ते कुठेतरी राहून जातं आणि मग अश्या स्ट्रेस आणि टेन्शन मुळे नकळत काही चुका झाल्याचं तर त्या मनाला लाऊन घेतल्या जातात.नुसता inlet(suppressing emotions)असून चालणार नाही तर कुठेतरी त्याला outlet(expressing emotions) असायलाचं हवा,नाही तर त्याचा स्फोट व्हायला वेळ लागत नाही.आणि माणूस म्हटलं की, मन आलच,आणि माणूस म्हटलं की,टेन्शन आणि स्ट्रेस हे सुद्धा पार्ट अँड पार्सलचं असतं नाही काय! स्ट्रेस मधून बाहेर निघाले नाही तर डिप्रेशन मध्ये बरेच लोक आत्महत्या हा चुकीचा मार्ग निवडतात आणि होत्याचं नव्हतं करून बसतात  मग ते कुठलाच विचार करत नाहीत की,आपल्या जाण्याने काय परिणाम होऊ शकतात,आपल्यामागे ज्यांना आपण सोडून जातोय त्यांना त्याचा किती त्रास होऊ शकतो. आता मोठ्या मोठ्या सिलिब्रेटींचेच उदाहरण घ्या ना,जसे सुशांत सिंग राजपूत त्याने स्वतः तरुणांना कसे positive असावे अश्या फिल्म मध्ये काम केले पण स्वतः मात्र टोकाचे पाऊल उचलले,काय कमी होती त्याच्या कडे name-fame सगळेच होते पण त्याच्या मनात काय चाललंय हे कुणालाच ठाऊक नव्हते त्याने पण outlet दिला नसावा आणि तो डिप्रेस होऊन त्याने ते पाऊल उचलले असावे,असे बरेच उदाहरणं आहेत जसे की, डॉक्टर शीतल आमटे -करजगी त्या पण motivational बोलायच्या पण त्यांनी पण चुकीचे पाऊल उचलले आणि छोट्याश्या आपल्या बाळाला पोरकं करून गेल्या.मनात साठविले की, त्याचा स्फोट होतोच, भय्यूजी महाराज अध्यात्मिक motivational speech द्यायचे पण त्यांनी देखील तेच पाऊल उचलले हे कितपत योग्य आहे.


जसा एखादा व्यक्ती वरून  शांत दिसत असला तरी त्याच्या आत( मनात)कुठलं वादळ चालू असेल सांगता येत नाही. ते ओळ्खणही ही कठीण असतं.जसे की,बदक वर वर पाण्यात शांत दिसत असला तरी आत पाण्याखाली त्याचे पाय वेगाने चालत असतात वरून शांत फक्त दाखविण्यासाठी असतं पण त्याचे कष्ट त्यालाच माहिती असतात.


मानवी शरीर हे विविध पंचतत्वपासून बनलेलं एक धरणचं आहे. या शरीरात समस्यांची आवक अतिप्रमाणात झाली तर हे मानवरूपी धरण फुटेल की,राहील?लाखो रुपये खर्च करून पाण्यासाठी मोठे धरण बांधले आणि त्याला बाहेर निघण्यासाठी outlet चं दिला नाही तर ते धरण राहील की,फुटेल अर्थातच ते धरण फुटेल कारण त्याला बाहेर निघायला outlet चं नाही.तसेच same to same व्यक्तीच्या बाबतीत घडतं मग ती स्त्री असो,पुरुष असो,मुलगी असो वा मुलगा पण या मनाच्या धरणाला outlet रुपी दरवाजा असणं गरजेचं आहे.


म्हणून आपल्या मनाचे outlet उघडे ठेवा,आपल्या तोंडाचे outlet वापरून आपल्या समस्या, आपले दुःख आपल्या माणसांना सांगा.आपल्या अंतर्मनाचे outlet ओपन करण्यासाठी ध्यान साधना, विपश्यना करा आणि शक्य झाल्यास आपल्याला मिळालेलं सगळ्यात मोठं outlet म्हणजे आपले डोळे आपल्याला असलेला स्ट्रेस, टेन्शन, दुःख सगळे ह्या डोळ्यांवाटे अश्रूद्वारे निघून जाऊ द्या,वाहून जाऊ द्या.पंख्याला लटकने,विहिरीत उडी मारणे, विष घेणे, पिस्तूलाच्या गोळीने स्वतःला उडविणे ह्यापेक्षा सोप्प आपल्या डोळ्यांद्वारे आपल्या अश्रूंचा बांध फुटू द्या बघा किती स्ट्रेस फ्री वाटतं ते.म्हणूनच मित्र आणि परिवार हा खूप मोठा outlet आणि आधार असतो त्यांचा आधार नक्की घ्या.


सगळ्यांसोबत हसा, बोला, भांडा, व्यक्त व्हा, मन मोकळं करा.कारण आपुलकीची माणसं मिळायला पण खूप भाग्य लागतं.


ऍड क्षमा आशिष धर्मपुरीवार(बासरकर)

अध्यक्ष, बाल कल्याण समिती, चंद्रपूर.

मो नं ८४८४०८२२२४

Friday, February 11, 2022

वयातील बदलणारी दशा

वयातील बदलणारी दशा


 सहज थोडंसं....


तिचं makeup करणं , ब्रँडेड कपडे घालणं  , सण समारंभात मुरडणं सारं सारं बंद होतं ... 

अन् अचानक ती सर्वांना "गबाळी” भासू लागते. 


तरीही ती त्याकडे लक्ष देत नाही कारण तिचं मातृत्व तिला तसं करू देत नाही...  

अजूनही तिला मुलांची जबाबदारी असते....!!!!


हळूहळू पुरुषवर्गाला अशी गबाळी बायको माहेरी जाण्यात सुख वाटू लागत....   तिचं साधेपणही खुपायला लागतं...


काही मंडळींना इतर बायका सुंदर वाटायला लागतात... अन कर्तव्य बजावणारी बायको आणि मुक्त फिरणाऱ्या बायका यात तुलना सुरू होते...    


पण तरीही ती याकडे दुर्लक्ष करून मुलांच्या वाढीवर लक्ष केंद्रित करते... आतून ती मनाला काळजीने स्वतःच वाळवी बनुन पोखरत असते....     !! 


आणि तिची पस्तिशी उलटते अन् अचानक ती अतिशय सुंदर भासू( ?)  लागते.... 

तिचे टॅलेंट नजरेत दिसू लागते.., 

तिचं आधुनिक राहणीमान , सुरेख hairstyle , नितळ त्वचा , मनमोकळं हसणं  , वागणं ,घरातला सहज सुंदर वावर.., 

विविध स्पर्धा जिंकणं , रेसिपीत आवड निर्माण करणं,   सर्वात मिसळणं... सारं सारंच सुंदर वाटू लागतं..!  


पण खरंच ती चाळिशीतच सुंदर दिसते का????  


खरं तर सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडताना होणारी तिची फजिती कमी होते,  बाळाच्या शी शु तुन ती मुक्त होते ... ,

टोमण्यांना उत्तर देण्याची धमक तिच्यात येते , सारं गेलेलं आयुष्य नव्याने उभारण्याची इच्छा जागृत होते ... 

अन् मनापासून तिला स्वतः साठी जगावसं वाटतं...!!! 


पुनः तरुण व्हावंसं वाटतं...ती गबाळी, गावंढळ कधीच नसते फक्त कर्तव्य पार पाडायला प्राधान्य दिलं होतं हे तिला कळून चुकतं अन् “ती कात टाकते”... . 


इतकं सहज सोपं गणित आहे ते....  


मला वाटतं ... नवं

स्त्री जातक बाळ ते वयस्कर आजी सर्वच सुंदर असतात ... होतो तो आजूबाजूच्या दृष्टीकोनात बदल ...! 


कॉलेज ची अल्लड तरुणी सुंदर नसते का?? पतींची वाट बघत असणारी घायाळ हरिणी सुंदर नसते का??? 


चंदेरी बट  सावरीत अन तोल जाऊ नये म्हणून तुरुतुरु चालणारी आजीबाई सुंदर नसते का???     


झाडाला फुल येण्यासाठी सुद्दा काही काळ जाऊ द्यावा लागतो ..  

मग इतक्या प्रचंड बदलातून जाणारी स्त्री एका रात्रीत कशी बरं बदलेल???   


आणि तिने स्वतः च्या दिसण्यावरच भर दिला तर बाळाचं संगोपन तितकं चांगलं होइल का?? 


म्हणूनच बायको गेली माहेरी वगैरे फालतू , रिकामटेकडे जोक्स तर तिच्या बाईपणाचाच अपमान आहेत....

त्यातून शरीरातील कमी होणारे कॅलशियम, hermonal changes अन् बदलते moods सांभाळून ती बदलून घेते स्वतःला ...


चाळीशीत तिचा आत्मविश्वास वाढलेला असतो म्हणून ती या वयात छान दिसते .. 


पण दृष्टी स्वच्छ असेल तर ती all time smart दिसते ..

ऍड क्षमा आशिष धर्मपुरीवार(बासरकर)

चंद्रपूर,8484082224


व्हॅलेन्टाईन्स आठवडा की सप्तपदी

  Valentine's week or saptpadi    व्हॅलेन्टाईन्स आठवडा की सप्तपदी मी हा जो लेख  लिहिलाय हे माझे व्यक्तिगत/वयक्तिक मत आहे त्यामुळे कुणाला...