मोबाईल फ्री ऑफलाईन आई- बाबा पाहिजे
हा जो लेख लिहिलाय मी, तो किती जणांना पटेल माहिती नाही पण plz कुणी वाईट वाटून वाईट comment करू नये.🙏
खरचं मुलं पण बिचारे बेजार होतात हो,कधी कधी म्हणजे बघा ना आई वडील मुलांना म्हणतात," मोबाईल जास्त वापरू नका रे पोरांनो" पण स्वतः मात्र आई वडील देखील किती त्या मोबाईल मध्ये मग्न झालेले असतात.त्यांचे त्यांना पण कळत नाही. म्हणूनच ह्या मोबाईल च्या दूनियेतून बाहेर निघून मुलांना वेळ देणं नितांत गरजेचं झालयं. मोबाईल जितका फायदेशीर म्हणता येईल त्याच्या दहापट तोटेही आहेत आणि ह्या मागील 3 वर्षाच्या कोरोना काळात तर आई बाबा, मुलगा, मुलगी, एवढेच काय तर ज्या आजी आजोबांना android mobile वापरता येतो असे आजी आजोबा सगळेच मोबाईल च्या आहारी गेले म्हणायला हरकत नाही.कारण कोरोना काळात घरातून बाहेर पडता येत नव्हते, मुलांना पण मागील 3 वर्षापासून शाळाही online च करावी लागली होती त्यामुळे करमणूक म्हणजे सगळ्यांसाठी मोबाईल. फक्त ह्यातले काहीच असे आजी आजोबा थोडेतरी टीव्ही च्या आणि मराठी serials मध्ये मग्न होते पण मुलं आणि आई बाबा मात्र मोबाईल मध्ये होतेच आणि तीच सवय पुढेही चालू राहिली आहे.
म्हणूनच कोरोना संपल्यावर जेव्हा शाळा सुरू झाल्या तेव्हा मात्र मुलांना खूप जड गेलं नवीन नवीन शाळेतलं ऑफलाईन शिक्षण. आणि मोबाईल मध्ये busy झालेले आईबाबांना पाहून देखील. कारण आजकालचे आई बाबा पण मोबाईल मध्ये खूप मग्न असतात असे म्हणणे वावगे ठरणार नाही.
लहान मुलांना खूप कळतं कारण आजकालची पिढी खूपच sharp mind असते. त्यांना मोबाईल फोन आवडत असला तरी त्यांना खेळणे सुद्धा तेवढेच प्रिय असते.ते थोड्यावेळ मोबाईल घेवून राहतील पण बोर झाले की,लगेच खेळण्यासाठी हट्ट ही करतील. अश्यावेळेला ला पोरं आई बाबांच्या मागे,माझ्याशी खेळा म्हणुन मागे लागतात पण तेव्हा आई बाबा मोबाईल मध्ये busy असेल तर मग ते लक्षही देत नाही तेव्हा त्यांना जाणवतं की, आपले आई बाबाच तर मोबाईल मध्ये busy आहेत मग आपणही मोबाईल घेवू बसतात कारण आपण त्यांच्या समोर जसे वागू तेही आपले अनुकरण करण्याचा प्रयत्न करतात.
म्हणून कुठेतरी वाचले की, इयत्ता पाचवीच्या वर्गातील सर्व विद्यार्थ्यांशी बोलल्यानंतर वर्ग शिक्षकांनी त्यांना कशी ‘आई’ आवडते यावर निबंध लिहायला दिला.
प्रत्येकाने आपल्या आईचे कौतुक करणारे वर्णन लिहिले. मात्र एका राहुल नावाच्या मुलाने त्याच्या मजकुरात शिर्षक लिहीले - "ऑफलाइन आई...!"
त्यावरून मला click झाले आणि लिहावेसे वाटले फक्त आईचं का?तर बाबा पण ऑफलाईन पाहिजे कारण आईवडील दोघांचाही वेळ मुलांसाठी मौल्यवान असतो.आणि मग तो पिल्लू आपल्या आई बाबांना म्हणेल,
मला "आई" "बाबा" दोघेही ऑफलाईन हवे,जेणेकरून त्यांना"माझ्यासाठी" आणि माझ्या घरच्यांसाठी "मोबाईल" पेक्षा "जास्त वेळ" असेल.
मला "आई""बाबा" पाहिजे, पण "ऑफ लाईन" पाहिजे.
मला असे "आई -बाबा"हवे जे मोबाइल चा कमी वापर करतील आणि किट्टी पार्टी किंवा भिसीमध्ये वेळ देण्याऐवजी मला जास्त वेळ देवून माझ्यासोबत सगळीकडे जाण्यासाठी ते उत्सुक असतील.
आई, तू ऑनलाइन पिझ्झा मागवू नकोस ग, घरी काहीही बनव.ते आम्ही आनंदाने खाऊ.
जेंव्हा मी रात्री झोपायला जाईन तेंव्हा व्हिडिओ गेम खेळण्याऐवजी ते एक गोष्ट सांगुन मला झोपवतील.अशी मुलांची ईच्छा असते.
आणि म्हणूनच ते म्हणतील,
मला फक्त मोबाईल फ्री ऑफलाइन "आई" "बाबा"पाहिजे.
खरचं पण आता ते गरजेचे झालंय सगळ्यांनी आधुनिक रहावं पण आपल्या मुलांचे बालपण जपणं ही तितकेच गरजेचे आहे, कारण ते बालपण एकदा निघून गेले की ते परत कधीच येणार नाही...🙏🙏🙏
सौ. क्षमा आशिष धर्मपुरिवार (बासरकर)
बा. क.स. अध्यक्ष.चंद्रपूर 8484082224