"आत्मनिर्भर भारत"
आत्मनिर्भर म्हणजे काय?खरंय आजच्या युगात सगळ्यांनीच आत्मनिर्भर होणे ही जणू काळाचीच गरज झालेली आहे आत्मनिर्भर म्हणजे स्वयंपूर्ण किंवा सेल्फ reliant .आपल्या गरजा आपणच पुर्ण करायच्या असा याचा ढोबळमानाने अर्थ होतो. आत्मनिर्भर कोणी असायला हवे, फक्त पुरुषच आत्मनिर्भर होऊ शकतो काय?तर असा विचार करणेच चुकीचे आहे.कारण स्त्री आता बंदिनी राहिलेली नाही .
महिला,नारी, स्त्री असे अनेक नावाने ओळखली जाणारी स्त्री तिला कधी जगात खूपच मान सन्मान दिल्या जातो तर कधी तिला अगदीच वाईट वागणूक दिली जाते हे आताचच नाही तर हे पूर्वीपासूनच चालत आलय ,पण काळ बदलला सावित्रीबाई फुले, रमाबाई रानडे, आनंदीबाई गोपाळ या सारख्या महिला समाज सुधारकांनी पुढारकार घेउन स्त्रीला तिच्या चूल आणि मूल या जगातून बाहेर काढले. शिक्षण देउन तिच्या हक्कांची जाणीव करून दिली. तिच्यात परिवर्तन घडवून आणले. त्यांनी केलेल्या महिला शिक्षण चळवळीचा स्त्रियांना फायदा झाला आणि महिला कर्तुत्ववान व कर्तबगार झाल्या. पण आता स्त्री शिकली,पूढे चालली तरी ही समाजात तिला म्हणावा तसा वाव मिळत नाही.तिला अजूनही अन्याय, अत्याचार आणि छळवणुकीला सामोरे जावंच लागतंय अजूनही स्त्री म्हणावी तितकी सुरक्षित नाहीये.
स्त्री ही शरीराने निर्मळ,बुद्धीमत्तेने हुशार तसेच सुसंकृत असायला हवी असे वंदनीय मावशींचे विचार होते आणि अश्याच व्यक्तिंमुळे भारत हा आत्मनिर्भर होऊ शकेल.
आपण आपली हिंदू जीवन शैलीचा अवलंब करणे आवश्यक आहे आपण स्त्रियांनी आपल्या कुटुंबात देखील त्याचा अवलंब करायला हवा जर आपणच त्याची सुरुवात केली तर आपण आत्मनिर्भर होऊ शकू आणि इतरांनाही आत्मनिर्भर होण्यास प्रोत्साहित होण्यास मदत करू शकू.
कुटुंब हा समाजातील एक महत्त्वाचा आणि आधारभूत असा प्राथमिक गट आहे. प्रेम, आपुलकी, त्याग, समान हितसंबंध जपण्याची ईर्षा,सहकार्य इ. कुटुंबजीवनातून निर्माण होणारे प्राथमिक भावबंध हे व्यापक समाजजीवनातही पाझरत जाऊन व्यक्त होतात. व्यक्तीच्या बालपणी सामाजिक, आर्थिक व सांस्कृतिक दृष्ट्या ती संपूर्णपणे कुटुंबाच्या आधीन असते. त्याचप्रमाणे समाजाच्या संस्कृतीचे कुटुंब हे एक प्रमुख वाहन असते. समाजाची मूल्ये, परंपरा, रीतीभाती व आचार ह्यांचा वारसा व्यक्तीला एका संस्कारक्षम अवस्थेत इतर संस्थांचा त्याच्या जीवनात प्रवेश होण्यापूर्वी कुटुंबाकडूनच मिळतो.म्हणूनच कुटुंबाचा विचार केल्याने जर कुटुंब स्वावलंबी बनले तर समाज स्वावलंबी बनेल, समाज स्वावलंबी बनला तर राष्ट्रही योग्य दिशेने स्वावलंबी बनेल.म्हणूनच व्यक्तीने जर चांगल्या विचारसरणीचा अवलंब करून आत्मनिर्भरतेकडे भर दिला तर आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी होऊन विकासाच्या दृष्टिकोनातून ते आवश्यक होईल.
तसेच कुटुंबामध्ये जर मुलांना कुटुंबातील व्यक्तिद्वारे ज्ञान वर्धक गोष्टींचे आदानप्रदान झाले आणि त्या पिढीवर जर चांगले संस्कार आणि चांगले शिक्षण दिल्या गेलेतर समाजामध्ये घडणाऱ्या विकृत मानसिकतेमध्ये त्याद्वारे बरेच बदल घडवून आणले जाऊ शकतात. जर पुढची पिढी किंवा समाज हा अशिक्षित आणि असंस्कारी राहिला तर बऱ्याच प्रमाणात विकृत मानसिकतेचे प्रकार वाढू शकतात आणि वाढतात सुद्धा आहेत.
सध्या मनोरंजनाचे क्षेत्र आणि माध्यम हे मूळ विचारसरणीपासून दूर गेले आहेत आणि काही अश्शील मनोरंजनामुळे असले माध्यम हे समाज जागृत होण्याऐवजी विघातक प्रवृत्ती मध्ये वाढ होण्याकरिता कारणीभूत ठरत आहे.
देवीच्या नवरात्रात मुलींना देवीचे रूप मानून तिची पुजा केली जाते सवाष्ण स्त्रीला देवीचे रूप समजून तिची ओटी भरली जाते.पण मग ते तेवढ्यापुरतेच मर्यादित का असावे, आज स्त्री ही कुठल्याही क्षेत्रात कमी नाही पण तरीही स्त्रियांवरील अत्याचाराचे प्रमाण काही केल्या कमी होत नाही.म्हणजे आज एक बलात्काराची बातमी कानावर पडली की लगेच दोन दिवसांनी दुसरी बलात्काराची बातमी कानावर पडते. अशा विघातक विकृतीने स्त्रियांना खेळणे बनवून ठेवलंय. आताच्याच दोन ताज्या घटना घडल्या आहेत एक म्हणजे हाथरस चे आणि दुसरे हरियाणा येथील निकिता तोमर हिचे प्रकरण. काय चूक होती त्या मुलींची त्यानी कधी असा विचार ही केला नसावा की,त्यांच्या सोबत असे काही भयावह घडू शकेल.त्या निकिता चे तर IAS होण्याचे स्वप्न होते पण तिचे स्वप्न स्वप्नच राहिले, असे स्त्रिया किंवा मुली कुठेतरी काही उंच झेप घेण्याच्या आधीच त्यांचे पंख असे छाटल्या जातात. म्हणूनच स्त्रियांनी कमजोर होता कामा नये.तसेच मुली असो वा मुले त्यांनी त्यांच्या सोबत घडणारी प्रत्येक गोष्ट ही कुटूंबातील मोठ्यानं सांगायला हवी जेणेकरून हे असले अनुचित प्रकारांवर आळा घालता येईल.म्हणूनच स्त्री शिकायला हवी ती शिकली तर ती संपुर्ण कुटुंबाला सुशिक्षित आणि सुसंस्कारीत करू शकते आणि मुलांवर चांगले संस्कार झालेत तर नक्कीच अशा विघातक प्रवृत्तीवर आळा बसेल.वेळ पडलीच तर स्त्री ही दुर्गा आणि चंडिकेचे रूपही घेऊ शकते त्यामुळे स्त्रीला कधीही कमजोर समजू नये.
आजच्या या कोरोनाच्या संकट समयी आपल्या भारत देशाला एक चांगली संधी मिळाली आहे ती म्हणजे स्वदेशी बद्दल जागरूकता करण्याची.आज बरेच लोकांनी आत्मनिर्भर होण्याची आणि स्वदेशीचा अवलंब करण्याची चांगली संधी चालून आलेली आहे त्या संधीचे सोने करायला काय हरकत आहे.म्हणूनच विदेशी वस्तू न वापरता स्वदेशि वस्तुच वापरणे म्हणजे स्वतःच्या देशाचा अभिमान बाळगणे होय.स्वदेशीचा पुरस्कार करणे ही काळाची गरज झालेली आहे म्हणूनच जात जात आत्मनिर्भर भारत वर एक कविता म्हणावीशी वाटते.
सोने की चिड़िया था मेरा देश
लूट कर ले गए, बना कर अलग अलग भेष
संस्कृति हमारी पुरानी सबसे
मिल जाते इसके बहुत अवशेष
जबरजस्ती सब थोप दिया
भोला मानुष करता भी तो क्या
विदेशी चीजों से घिर गया भारत
अस्त व्यस्त इस्तेमाल से मरता भी तो क्या
समय आ गया है परिवर्तन का
स्वदेशी उत्पाद के समर्थन का
विश्व में भारत का भौकाल होगा
हर कोई अब यहां खुशहाल होगा
हर घर में मेक इन इंडिया
का सपना अब सब है देख रहे
आत्मनिर्भर अब बनेगा भारत
कट विदेशी चीजों के अब हैं पेच रहे
आत्मनिर्भर बनेगा भारत खुद के बने हथियारों से
आत्मनिर्भर बनेगा भारत मेलजोल के भाईचारों से
आत्मनिर्भर बनेगा भारत खुद के ही विचारों से
आत्मनिर्भर बनेगा भारत खुद के ही आविष्कारों से
न सरहद पर लड़ने जाना
ना ही कोई खून बहाना
आत्मनिर्भर हो मेरा वतन
मुझे स्वदेशी है अपनाना
आत्मनिर्भर हो मेरा वतन.
ऍड. सौ. क्षमा आ.बासरकर-धर्मपुरीवार.
सदस्य, बाल न्यायमंडळ, चंद्रपूर.
फो न.८४८४०८२२२४
लेख मस्त लिहिलंय.👌👌
ReplyDeleteThank u so much😊
DeleteThank u so much😊
DeleteThank u so much😊
Deleteखुप छान लेख 👌👌
ReplyDeleteThank u so much😊
DeleteThank u so much😊
DeleteKhup sundar lekh...apratim likhan...kharach aaj hech garajey aahey....chaan vyakhya ...aatmanirbhar tey chi
ReplyDeleteThank u so much tai😊
ReplyDeleteMast 👌
ReplyDeleteThank u so much😊
Delete