Friday, March 26, 2021

बालपण - एक फुलपाखरु, इंटरनेट च्या चक्रव्यूहात अडकलेलं

    (बालपण - एक फुलपाखरु, इंटरनेट च्या चक्रव्यूहात अडकलेलं)


बालपण म्हणजे स्वछंदी फुलपाखरू,

बालपण म्हणजे निस्वार्थ प्रेम,

बालपण म्हणजे निस्वार्थ हसणं,

बालपण म्हणजे निस्वार्थ जगणं, 

बालपण म्हणजे एक सुंदर अनुभूती.

Thank u अवधूत बेटा खरंच तू आज आम्हा(आई-बाबा) दोघांनाही बालपणीची आठवण करून दिलीस.दिवसभर आम्ही व्यस्त असतो त्यामुळे अवधुतला वेळ द्यायला आम्ही ऑफीस मधून घरी आल्यानंतर आणि सुट्टीचे दिवस असतात. तर काल रात्री त्यालाच सुचलं आणि म्हणाला आई बाबा आपण मी सांगेल तसा गेम खेळूया  काय?आम्ही म्हटले "कुठला गेम खेळायचा बेटा"तर तो म्हणाला की,आपण आज चित्र काढून बघण्याची स्पर्धा करूया तिघेपण जण, पहिल्यांदा नको वाटले कारण आता किती तरी दिवस झाले असतील चित्र काढणे वगैरे सगळं दूरच राहिलंय पण त्याच्या आनंदासाठी आम्ही दोघेही तयार झालो त्याने आम्हला सांगितले की,आई बाबा मी वेळ देणार त्यावेळेत चित्र काढा कुठलही चित्र काढा तुम्हाला जे वाटतं ते, तोही काढणार होताच आमच्या सोबत चित्र,तो तर आता न शिकताही बऱ्या पैकी एक्सपर्ट झालाय.मग आलो बालपणीच्या आठवणीत आणि सुरुवात केली चित्र काढायला आणि  काढले चित्र वेळेत.खूप मस्त वाटले अगदी लहानपणात गेल्या सारखे वाटले.या कोरोना काळात मोठी मंडळी तर कंटाळालीच आहेत  पण लहान मुलांना या काळात हँडल करणे म्हणजे जरासं कठीण होऊन बसलंय कारण ह्या कोरोनाने त्यांच बालपणचं हिरावलय,कारण ज्या प्रमाणात मैदानी खेळ त्यांनी खेळायला हवे ते त्यांना मिळतच नाहीये. पूर्वीचे खेळ किती सुदंर असायचे, लगोरी, टिक्कर बिल्ला, पिंकी पिंकी व्हॉट कलर, विटी दांडू मस्त असायचे सगळेच खेळ पण या इंटरनेट ने मुलांना काय मोठ्यांना पण वेडं करून सोडलंय म्हणून मुलामुलींनी outdoor activity सोबत indoor activity साठी कुठले तरी छंद जोपासले तर त्या मोबाईल पासून मुलांना काही काळ का होईना दूर ठेवता येतं अस मला वाटतं.कारण कोरोना काळात मुलांनी बाहेर जाणं जर risky वाटतं. म्हणून indoor activity हवी, नाहीतर तर इतरवेळेला मुलं बाहेर खेळतातच.

खरंच बालपण किती सुंदर असतं नाही काय ! आजकालच्या धावपळीच्या युगात प्रत्येकजण ज्याच्या त्याच्या परी तो व्यस्तच असतो. मग ती मोठी माणसं असोत की लहान मुलं असोत. आणि या इंटरनेट च्या दुनियेत तर जिथे जावे तिथे मग छोटं बाळ का असेना तो रडत असला की, त्याची आई देखील त्याच्या हातात  मोबाईल देते आणि काहीतरी लावून दिलं की,ते बाळही लगेच शांत राहतं.मग आता या छोट्या बाळाला काही समजत नसून देखील तो त्या मोबाईल च्या प्रेमात पडतो तर मोठी मंडळी आणि तरुण मुलं तर वेडीच झाली आहेत त्या मोबाईल मुळे. पूर्वी टेलिफोन होता तेव्हा इतकं नव्हतं त्या फोनच वेड कुणालाच.पण हळू हळू मोबाईल ची सुरुवात झाली आणि तो टेलिफोन तर पडद्याआड गेला म्हणायला काहीच हरकत नाही.पण वाईट याचंच वाटतं की,इंटरनेट चे जितके  फायदे आहे त्याच्या दुप्पट तोटेही आहेत असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही आणि हो एकदा काय त्या मोबाईल मधल्या गेम ची किंवा इतर apps ची सवय लागली की, मग त्यातून बाहेर निघणे खूपच कठीण आणि अशक्यप्राय बाब आहे.

बालकांच्या क्षेत्रात काम करताना हे मला प्रकर्षाने जाणवले की,मुलं एखाद्या गोष्टीच्या आहारी गेले की,त्या चक्रव्यूहातून बाहेर पडणे खूपच कठीण होऊन जातं आणि मग त्या मुलांना त्या अवस्थेतून बाहेर काढणे म्हणजे मुलांच्या आईवडिलांची देखील  तारेवरची कसरतच  होत असते.आजची तरुण पोरं ही त्या मोबाईल आणि इंटरनेट च्या इतकी नादी लागलीत की, त्यामुळे बरीच मुलं मुली गुन्हेगारी प्रवृत्तिकडे वळायला लागलेत. शिक्षणाकरिता काही काळ इंटरनेट/ मोबाईल वापरणे वाईट नाही कारण आता ती काळाची गरज झाली आहे असे म्हणायला हरकत नाही  पण त्याच्या पलीकडे जाऊन जर त्याचा दुरुपयोग होत असेल तर ते खूप धोकादायक ठरतं आणि त्याचा त्रास त्या मुलाला तर होतोच पण घरची मंडळी देखील त्याच्या त्या कृत्यामुळे  त्यांना देखील शरमेने मान खाली घालण्याची वेळ येते.म्हणूनच ८ ते ९ वर्षांपासून प्रत्येकचं आईवडिलांनी आपल्या मुलामुलींसोबत मैत्री चे नाते निर्माण करायला हवे कारण ८ ते १८ वर्ष वय हे  मुलामुलींसाठी खूपच महत्वपूर्ण असतं आणि त्यांच्या आई वडीलांसाठी सुध्दा कारण इथे मुलं चुकली की,त्यांना संधी देणं गरजेचं असतं एकदा का, ती हाताबाहेर गेली की,मग मात्र त्यांना समजावणे थोडं कठीण होऊन जातं आणि त्या परिस्थितीतून बाहेर काढायचे असेल तर  त्यांना समुपदेशन, प्रेम आणि आपुलकीची अतिशय गरज असते.शहरात तर मोबाईल मुळे मुलांवर परिणाम होतोच आहे पण जर खेड्यातली परिस्थिती बघितली तर ती अजूनच वाईट असते कारण तिथे सगळ्या मुलांजवळ मोबाईल असेलच असे नाही एखादा मुलगा जरा बऱ्या घरचा असेल आणि त्याचा जवळ android मोबाईल असेल तर पूर्ण गावातली मुलं घोळका करून गल्ली बोळात बारीक मध्ये व्हिडिओ पाहत बसलेली असतात. आणि या अश्या व्हिडिओ,सिरिअल्स, मूव्हीस मुळं मुलांचं गुन्हेगारीचं प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चाललयं आणि त्यातूनच चोरीचे तर प्रमाण वाढलेच आहे,का तर आई वडील मोबाईल घेऊन देत नाही, मोबाईल घ्यायचाय म्हणून चोरी केली,कुणी मुलं म्हणतात की,play station ला जाऊन game खेळायची (लत) लागली होती.मुद्दाम (लत)हा शब्द वापरलाय कारण हे सुद्धा एक व्यसनच आहे आणि त्या व्यसनापायी मुलं चोरी करतात एका मुलाला विचारले की, "चोरी क्यु की" तर तो म्हणाला की,"play station मे जाके खेलने की आदत लग गयी थी और घर से पैसे नही मिलते थे इसलीये चोरी की",बघा म्हणजे इतक्या छोट्याश्या कारणासाठी तो मुलगा त्याच्या आहारी गेला आणि चोरी करून बसला काही मुलं मुली  घाणेरडे पॉर्न विडिओ वगैरे बघून अशी घाणेरडी पाऊलं उचलतात. आणि अजून एक सांगावंसं वाटतंय की,मुलांकडे लक्ष देणं,त्यांच्याशी मैत्री करून त्यांना बोलतं करणं अत्यंत गरजेचे आहे त्यांना सांगायला हवे की, बेटा प्रत्येक गोष्ट आईबाबाला सांगत जा,खोटं बोलू नका,कुठलीही गोष्ट मनात ठेवू नका कारण आजकालची मुलंमुली बऱ्याच गोष्टी आई वडिलांपासून लपवून ठेवतात आणि मनातल्या मनात ठेवून मग टोकाचे पाऊल उचलून आत्महत्या सारखे कृत्य करतात.आणि पालकांनी पण मुलांकडे आवर्जून लक्ष द्यायला हवे की,मुलगा कोणासोबत खेळतो,कोणासोबत जातो या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींकडे त्यांच्या नकळत का होईना लक्ष असायला हवे आणि मुलामुलींच्या वयापेक्षा मोठ्या मुलामुलींची संगत असायला नको.ती संगत लागली तर काही वाईट संगतीचा सहवासात मुलं केव्हा गुन्हेगारी कडे वळतील काहीच सांगता येत नाही.म्हणूनच मुलांकडे वेळीच लक्ष दिले गेले तर त्यांचे भविष्य तर सुधारेलच भारतालाही सुशिक्षित पिढी लाभेल यात यत्किंचितही शंका नाही.

ऍड.क्षमा आशिष धर्मपुरीवार(बासरकर)

बा. क.स.अध्यक्ष चंद्रपूर.

फो. न.८४८४०८२२२४

Sunday, March 7, 2021

मोकळा श्वास फुलराणीचा(स्त्रीचा)

 मोकळा श्वास फुलराणीचा(स्त्रीचा-बलिकांचा)


सर्वप्रथम माझ्या सगळ्या फुलराणींना आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा💐


हिरवेहिरवे गार गालिचे

हरित तृणांच्या मखमालीचे

त्या सुंदर मखमालीवरती

फुलराणी ही खेळत होती...


आज अजूनही २१ व्या शतकात फुलराणी(स्त्री)ही मोकळा श्वास घेऊ शकते काय हो?आजही स्त्रियांच्या बाजूने निर्माण केलेले असंख्य कायदे, संघटना, उपक्रम या स्त्रीवादी कायद्यांच्या मखमलीवर ही फुलराणी नक्की खेळत आहे की, जळत आहे, असा प्रश्न तितक्याच आवेशाने उभा राहतो. 

स्वतंत्र भारतात तुम्ही बऱ्याचदा पाहिले असेल महिलांची प्रगती आणि त्यांच्या अधिकारांवर बोलताना. तसेच त्यांचा सन्मान, आदर आणि प्रेम व्यक्त करण्यासाठी "महिला दिवस"आणि "जागतिक महिला दिवस" साजरा केला जातो. 8 मार्च रोजी संपूर्ण जगात महिला दिवस साजरा केला जातो. चला पाहूया 8 मार्च या दिवशी महिला दिन साजरा का केला जातो.


1909 मध्ये अमेरिकेत सोशलिस्ट पार्टीने एक घोषणा केली आणि युनायटेड स्टेटमध्ये पहिला जागतिक महिला दिन 28 फेब्रुवारी रोजी साजरा करण्यात आला होता. यानंतर सन 1910 च्या आंतरराष्ट्रीय महिला परिषेदत मांडलेल्या सुचनेनुसार, 8 मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून निश्चित करण्यात आला. तसेच 19 मार्चला पहिल्यांदा ऑस्ट्रिया डेन्मार्क आणि स्वित्झरलँडमध्येही जागतिक महिला दिवस साजर केला गेला.दोन वर्षानंतर 1913 मध्ये जागतिक महिला दिनाची तारीख बदलून 8 मार्च करण्यात आली आणि तेव्हापासून आजचा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो.


जरी स्त्रिया आज मोठया मोठया पदावर काम करीत असल्या, अगदी राजकारणापासून ते भारतीय सेनेपर्यंत तिने आपली मजल मारली असली तरी वैयक्तिक आयुष्यात मात्र तिच्यावर असलेली कुटुंबाची स्वयंपाक घरातील अग्नी तेवत ठेवायची जबाबदारी कायम आहेच. सती बळीची जागा हुंडाबळीने घेतली. गर्भजल परीक्षण, विनयभंग, बलात्कार अशा अनेक रुपाने स्त्रिया आजही सती जात आहेत. आजची परिस्थिती पाहता असे वाटते की, मग स्त्री सुधारणावादी कायद्यांनी केले काय? तर केवळ अन्याय अत्याचाराचे मुखवटे बदलले आणि स्त्री बाबतचा पारंपरिक दृष्टिकोन, तिचा छळ, अपमान कायम राहिला. स्त्रियांच्या बाजूने असंख्य कायदे, संघटना असल्या तरी तिचे प्रश्न कायम आहेत. निष्ठावान विवाहित स्त्रियांचे   प्रश्न आहेत. घटस्फोट घेतला नाही तर छळ आहे,प्रेम मान्य केले तर ठीक,नाही तर फुलराणीला जळणे आहे. म्हणजे स्त्रियांच्या बाजूने मखमालीचे कायदे असले तरी ती वेगवेगळ्या रुपाने ती जळतेच आहे.फुलराणी म्हणजे आपल्याच लेकी सुना हो,जेव्हा प्रत्येकाच्या फुलराणीला घरी यायला उशीर होतो, तेव्हा  लागेना डोळ्याशी डोळा-काय जाहले फुलराणीला?अशी भीती मनात बसलेली असते म्हणजे लेकी सुना वेळेत घरी आल्या नाही की जीवात जीव नसतो,एकीकडे भाषणातून स्त्रियांबद्दलचे आदराचे शब्द, तिच्या कामगिरीचे शब्द, कौतुकाचे शब्द गायीले जात असले तरी ते मात्र प्रत्यक्षात हे सर्व भाषणापुरतेच राहतं.अजूनही स्त्री(फुलराणी) ही मोकळा श्वास पूर्णपणे घेऊच शकत नाही.


 मोबाईल इंटरनेट ने तर अश्लिलतेचा कळसचं गाठला अहे. आणखीन किती निर्भया, फुलराणी निर्माण होतील काय माहीती.शासनाचे अशा गुन्ह्यांबाबत लवचिक धोरण यामुळे प्रत्येक ठिकाणी पुरुषांच्या आधाशी नजरा टपलेल्या असतात. ना नात्याचा, ना वयाचा,ना माणुसकीचा विचार केला जातो. त्या नराधमांना हवी असते ती शिकार फक्त शिकार आणि म्हणून अनेक चिमुरड्यादेखील उमलण्याच्या आधीच खुडत आहेत.


 बेटी बचाव, बेटी पढाव हा नारा नुसता हवेत नको तर प्रत्येकाच्या अंतरंगात असणे गरजेचे आहे. या देशात घडत असलेल्या घटना पाहताना "बेटी कैसे बचाएंगे"हाच मोठा प्रश्न सर्वांसमोर उभा असतो. एकतर्फी प्रेम, जबरदस्तीचे प्रेम, आपल्याला न मिळालेले प्रेम, दुसऱ्याला देखील मिळू देणार नाही, अशा संस्कारांचा आपला देश नाही. मग का होत आहे हे सगळे? आपली संस्कृती बदलत चालली आहे? त्यामागे प्रेम असते, दुसऱ्याच्या सुखात स्वतःचे सुख शोधायचे असते. हे विचार गेले तरी कुठे?स्त्री ही कुणाची तरी आई, कुणाची तरी बहीण, पत्नी, मुलगी असते. या सर्व भूमिकेतून आपल्या पुरुष असलेल्या मुलास, भावास व पतीस पुढे जाऊन सांगावे लागेल की,जसा आमचा मान राखतोस तसा आमच्या सारख्या स्त्रियांचादेखील मान राख.आता ही जबाबदारी देखील स्त्रियांवरच आली आहे. अशी भावना जर प्रत्येक मुलाने ठेवली तर अश्या गुन्ह्यांवर बऱ्याच प्रमाणात आळा बसेल नाही काय?म्हणूनच मग आई जशी मुलीला बाहेर जाताना समजावून सांगते चांगल्या वागणुकीबद्दल तसेच चार शब्द आईनेच बाहेर जाणाऱ्या आपल्या मुलाला देखील सांगायला हवे की, स्त्री किंवा परक्या मुलीकडे वाईट नजरेने बघू नकोस म्हणून.


जागतिक महिलादिनाच्या निमित्ताने महिलांचे एकत्रिकरण, सबलीकरण, आदरीकरण, आनंद, उत्साह, पारितोषिके, सन्मान, गौरव, पुरस्कार यामुळे दरवर्षी महिला दिन प्रेरणा देणारा, ऊर्जा देणारा वाटतो. मरगळलेल्या स्त्रीत्वाला एक उजाळा देण्यासाठी हा दिवस प्रेरक ठरतो.पण हे केवळ या एकाच दिवसापुरते मर्यादित नसावे. आपल्या नात्यातील पुरुष वर्गाला जर स्त्रीविषयक चांगले संस्कार मिळाले तर निश्चितच हुंडाबळी, स्त्रीभ्रूणहत्या, मारहाण, शिवीगाळ,पुरुषप्रधान संस्कृतीतील मुस्कटदाबी थांबण्यास निश्चितच हातभार लागेल. या महिला दिनाच्या दिवशी एक आशा करूया की,ही  फुलराणी जळणार नाही तर खुलणारी, खेळणारी असेल आणि मग त्या सुंदर मखमाली वरती फुलराणी ही खेळत राहील,आनंदी राहील.आताही या कोरोना महामारीच्या संकटात देखील स्त्री डगमगली नाही प्रत्येक क्षेत्रात तीने पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम केले मग ती फुलराणी सबला नाही काय?बालकवींच्या हिरवे हिरवे गार गालिचे या कवितेच्या ओळींचा अर्थ सार्थकी लागेल.म्हणूनच आपल्या या फुलराणीला म्हणावेसे वाटते-


जीत पक्की है

कुछ करना है, तो डटकर चल।

थोड़ा दुनियां से हटकर चल।

लक पर तो सभी चल लेते है,

कभी इतिहास को पलटकर चल।

बिना काम के मुकाम कैसा ?

बिना मेहनत के, दाम कैसा ?

जब तक ना हाँसिल हो मंज़िल

तो राह में, आराम कैसा ?

अर्जुन सा, निशाना रख, मन में,

ना कोई बहाना रख।

जो लक्ष्य सामने है,

बस उसी पे अपना ठिकाना रख।

सोच मत, साकार कर ,

अपने कर्मो से प्यार कर।

मिलेंगा तेरी मेहनत का फल,

किसी और का ना इंतज़ार कर।

जो चले थे अकेले 

उनके पीछे आज कई लोगो के मेले हैं ।


ऍड. सौ.क्षमा आशिष बासरकर-धर्मपुरीवार

बा क. स. अध्यक्ष  चंद्रपूर. 8484082224

व्हॅलेन्टाईन्स आठवडा की सप्तपदी

  Valentine's week or saptpadi    व्हॅलेन्टाईन्स आठवडा की सप्तपदी मी हा जो लेख  लिहिलाय हे माझे व्यक्तिगत/वयक्तिक मत आहे त्यामुळे कुणाला...