Monday, November 2, 2020

असावे घरटे आपुले छान

  

                          असावे घरटे आपुले छान

                                       

                           दृष्ट लागण्या जोगे सारे, गालबोटही कुठे नसे  

                          स्वप्नाहून सुंदर घरटे मनाहून असेल मोठे 

                                   दोघांनाही जे जे हवे त..." 

                         दृष्ट लागण्या जोगे सारे, गालबोटही कुठे नसे 

                         जग दोघांचे असे रचू की स्वर्ग त्यापुढे फिका पडे

                             स्वप्नाहून सुंदर घरटे मनाहून असेल मोठे 

                                       दोघांनाही जे जे हवे ते......"

                           दृष्ट लागण्या जोगे सारे, गालबोटही कुठे नसे 

                            जग दोघांचे असे रचू की स्वर्ग त्यापुढे फिका पडे

     म्हणूनच माणूस असो वा पक्षी सगळ्यांनाच आपलं घर(घरटं) प्रिय असतं.

मी आताच," अनं मन सुन्न झाले"या माझ्या लेखात स्पष्ट केले होते की,माणसाची प्रवृत्ती ही कशी विकृत झाली आहे स्त्रिया आणि मुलींप्रति, मी पुन्हा म्हणेल की सगळेच पुरुष तसे नसतात पण आपण समाजातल्या लोकांची तुलना ही पक्षी प्राण्यांसोबत नक्कीच करू शकू म्हणजे बलात्कारी जसे हिंस्त्र प्राण्यांप्रमाणे स्त्रियांवर तुटून पडतात,म्हणून आपण त्यांची तुलना प्राण्यांशी करूच शकतो पण तसेच काही चांगल्या गोष्टी ह्या पक्षी,प्राण्यांपासून शिकू पण शकतो बरं काय!

आजचा विषय इतका छान  आहे कि,मी विचार  केला  चला आपण पण काही तरी शेअर करुया.तशी मला निरनिराळे फोटो काढण्याची बऱ्यापैकी आवड आहे काही नवीन दिसले की,त्याला कॅमेरा मध्ये टिपायला आवडतं मला.माझ्या  ह्या कामात मला काही  नविन पाहुण्यांची सोबत घडलीआहे,ते पाहूणे म्हणजे  पक्षी.उन्हाळा  संपत आला कि मला ही आता  त्या  पाहूण्याची सोय  करण्याचा  छंद  लागला  होता.उन्हाळा आला की त्यांच्या करीता पाण्याची आणि दाण्याची सोय करते.गेल्या  जून/जुलै महिनाभर  बुलबुल पक्ष्याचा मुक्काम  माझ्या घरी होता.घरटे बांधणे ते पिल्ले उडून  जाण्यापर्यंत सर्व  जवळून  बघितले.त्यांच्या खाण्याची  सोय,पावसाळ्यात घरटे वाचण्यासाठी  केलेली सोय हे सगळे  करतांना आंनद मिळाला.निर्सगाचा चमत्कार  इतक्या  जवळून  बघता आला आता मात्र  ती पिल्ले उडून  गेले तेव्हा मात्र खूपच त्रास झाला कारण रोज त्यांचा आवाज,त्यांची किलबिल ऐकू यायची, म्हणतो ना माणसांमध्ये जसा जिव्हाळा असतो तसाच जिव्हाळा आम्हाला म्हणजे त्यात माझे मिस्टर आणि मुलाला पण लागला होता सतत आम्ही त्यांना बघायचो आवाज आला नाही त्यांच्या किलबिलाटाचा, की जीव कासावीस व्हायचा की, काय झाले असेल म्हणून,खरंच हे सगळं बघताना खूप मज्जा पण आली आणि ते गेल्यावर तेवढंच दुःख ही झाले.

                    पण खरचं हे सगळं बघताना जाणवले की माणसं काय,पक्षी काय किंवा प्राणी काय प्रत्येकाला आपलं घरटं प्रियच असतं,म्हणतो ना की घराला घरपण बायकामुलांमुळे येतं ते काही खोटं नाही आणि तोच जिव्हाळा मी ह्या पक्षांमध्ये सुद्धा बघितला त्यांची घरटं बनवण्याची जिद्द आणि ते दोघे बुलबुल पक्षी पक्षीण इतके जीव तोडून मेहनत करत होते घरटं बांधण्याकरिता,खरच तसंच आपल्या माणसांमध्ये सुद्धा घडतं पुरुष असो वा स्त्री ती आपल्या घरासाठी, आपल्या पिलांसाठी जीव तोडून मेहनत करतात की त्यांना सर्व सुखसोयी मिळाव्यात म्हणून खरंच खूपच सुंदर अनुभव होता तो की, कसे ते पक्षीं पक्षींण सुद्धा आपल्या पिलांना जन्माला घालण्यासाठी जीव तोडून मेहनत करीत होते अगदी दोघेही सोबत सोबत सगळं काम करीत होते हे बघून खूप छान वाटले. असेच माणसांच्या पण आयुष्यात घडतं.जेव्हा घरी नवीन पाहून येणार असतो तेव्हा आनंदाला पारावार उरलेला नसतो एक वेगळाच आनंद असतो तो शब्दात व्यक्त न होण्यासारखा असतो,तसंच काहीसं इथे घडताना दिसले जरी आपल्याला त्या पक्षाची भाषा कळत नसली तरी त्यांच्या हालचाली वरून जाणवत होतं त्या पक्षांच्या आई बाबा होण्याचा जिव्हाळा म्हणा की त्यांची तगमग म्हणा तर अशाप्रकारे त्या बाळाच्या आगमनासाठी त्या आई बाबाची (बुलबुल पक्षीं पक्षिणीची)तयारी सुरू झाली. 

                      त्यांची घरटं बांधण्याची तयारी सुरू झाली आमच्या कडे आम्ही हँगिंग कुंडी मध्ये पण झाडं लावलेले आहेत तर त्यांनी त्यांच्या घरट्या करिता ती जागा निवडली आणि सुरू झाला त्यांचा प्रवास रोज काडी कचरा आणणे आणि त्याला इतके सुदंर प्रकारे विणले की तूम्ही पण दाद द्याल त्या गोष्टीला,म्हणजे बघा ना जसं माणूस आपले घर बांधताना किती विचार करतो की, आपलं घर खूप सुंदर व्हावं तसेच काहीसे मी फोटो टाकणारच आहे तेव्हा बघाल की, किती सुंदर विणले आहे,खरच माणूस जसा आपल्या परिवारासाठी धडपड करतो तसं ते करताना दिसले.सुंदरसं घरटं बांधून झाल्यावर मग त्या पक्षिणीने अंड द्यायला सुरुवात केली असे बघता बघता ८ दिवसात तिने ४ अंडी दिलीत,ती पण इतकी सुंदर होती एकदम निराळा रंग,ते अंड दिल्यावर ते दोघेही अगदी त्याचे रक्षण करत असायचे बिलकुल कुणा इतर पक्षी म्हणा की व्यक्ती म्हणा कुणालाही फिरकू द्यायचे नाही ,आपण जर त्यांच्या घरट्या जवळ गेलो की ते करायचे काही नाही पण जवळून एक गिरकी घालून निघून जायचे कारण त्यांच्याही मनात भीती असणार की त्यांच्या पिलांना कुणी काही करणार तर नाही ना, असंच नेमकं माणसाच्या आयुष्यात होतं मुलांबद्दल आई बाबा पण खूप जागरूक असतात त्यांच्यासाठी ते जीव तोडून मेहनत घेतात आणि विचार तोच असतो सगळ्या आई बाबांचा की मुलाला किंवा मुलीला काहीही कमी पडू द्यायचे नाही,जे आपल्याला नाही मिळालं ते आपल्या मुलांना मिळायला हवे,त्यांनी आपल्या पायांवर खंबीरपणे उभे राहावे.अशीच तगमग पक्षांमध्ये त्याच्या पिलांप्रति दिसून आली,ते त्यांना जगात आणायचे होते म्हणून  किती धडपड करीत  होते  काही मोठे पक्षी येऊन खूप त्रास द्यायचे त्या बुलबुल पक्षी पक्षिणीला, पण त्या दोघांनी मिळून त्या मोठ्या पक्षांना पण हाकलून लावले तेवढे बळ त्या दोघांमध्ये कुठून आले असेल तर त्यांची ताकत म्हणजे त्यांचे येणारी पिल्लं.मग असे बघता बघता  ४ पिल्लं झालीत आणि मग त्या पक्षांची तगमग सुरू झाली त्या पिलांना दाणा भरवण्याची दोघेही पक्षी पक्षींन जायचे दाणा आणायला पण एक जण थांबायचा आणि दुसरा दाणा आणायला जायचा किती काळजी बघा,इतका पाऊस, वारा, वादळ सोसत ते दोघेही तिथुन हलायचे नाही, तरीही आम्ही त्यांची बऱ्यापैकी सोय केली होती  आणि मग पिल्ल थोडे मोठे झाले आणि त्यांनी त्यांचं बस्तान हलवलं खूप वाईट वाटलं,तसचं बऱ्याच माणसांच्या पण आयुष्यात घडतं की नाही हो म्हणजे मला असं वाटतं की, आई वडील मुलामुलींना धडपड करून शिकवतात, मोठं करतात आणि मुलं नोकरीला लागले की परदेशात नोकरीसाठी जातात आणि कायमचे टिकडचेच होतात आणि आई वडिलांना भारतात मोठ्या शहरात फ्लॅट घेऊन देतात आणि सगळ्या कामांना माणसं लावून देतात आणि बरोबर पैसे पाठवतात, पण मला सांगा की त्या आई वडिलांनी आपल्यासाठी इतकी धडपड केलेली असते तर मग त्या आई वडिलांची नुसतं पैसे पाठवून त्यात त्यांना मुलांचा जिव्हाळा, प्रेम मिळेल काय हो,त्यांना त्यांच्या नातवांच सुख मिळेल काय हो,म्हणूनच मला माणसांची तुलना त्या पक्षांशी करावीशी वाटली कारण करण घरात माणसं असली की कशी सवय लागते सतत त्यांस बघायची आणि त्यांच्या जिव्हाळ्याची तसेच मला सतत त्या पक्षांना बघायची सवय झाली होती.अजूनही गॅलरीत आलं की आधी लक्ष त्या कुंडी कडे जातं.म्हणून त्या पक्षांना तर म्हणावेसे तर वाटतंच पण जे मुलं आपल्या आई वडीलांपासून दूर राहतात त्यांना पण म्हणावसं वाटतं 

               "या पिल्लानो परत फिरारे घराकडे आपुल्या"



सौ. क्षमा आ. बासरकर धर्मपुरीवार,

सदस्य,बाल न्यायमंडळ,चंद्रपुर

फोन न.8484082224


                


No comments:

Post a Comment

व्हॅलेन्टाईन्स आठवडा की सप्तपदी

  Valentine's week or saptpadi    व्हॅलेन्टाईन्स आठवडा की सप्तपदी मी हा जो लेख  लिहिलाय हे माझे व्यक्तिगत/वयक्तिक मत आहे त्यामुळे कुणाला...