स्त्री मनातील स्त्री
(स्त्री मन )
फेसबुक वर माहेरचा कट्टा हा जो प्लॅट फॉर्म सुरू केलाय महिलांकरिता तो खूप छान माहिती पुरविणारा ग्रुप आहे. पण त्यातही काही महिलांनी जे काही अनुभव म्हणा किंवा समस्या म्हणा मांडल्या किंवा व्यक्त केलाय त्यावरूनच मी हा लेख लिहिलायं कारण स्त्रिया ह्या कितीही स्वतंत्र झाल्या असं म्हटलं जातं पण त्या पूर्णपणे स्वतंत्र झाल्या काय हो वाटतं काय तुम्हाला असं आणि म्हणूनच मग या महिला दिनाच्या निमित्ताने हा लेख लिहावासा वाटला.
खरं तर हा लेख मी खूप आधीच लिहिलेला होता आणि तो परिचयातील लोकांना पाठविला पण पुरुष मंडळी कडणं negative कंमेंट्स मिळाल्या. म्हणजे त्यांना असे वाटले की,मी माझा अनुभव शेअर करते आहे पण हा चुकीचा समज त्यांनी करून घेतला म्हणजे समाजात चाललेल्या चालू घडामोडींवर आपण नाही लिहू शकत काय पण नाही समाजात चुकीचा आणि नकारार्थी विचार करणारे बरेच लोक आहेत ना,मला खूप वाईट वाटले हे सगळे बघून म्हणजे मी एक स्त्री आहे आणि मी स्त्री मन जाणण्याचा च प्रयत्न केला तर कुठे चुकले माझे, म्हणजे मी स्त्री मनातली स्त्री जाणण्याचाच प्रयत्न केला होता ना.त्यात काय वावगं आहे.
"बंदिनी स्री ही बंदिनी हृदयी पान्हा नयनी पाणी,जन्मोजन्मीची कहाणी बंदिनी स्त्री ही बंदिनी"
महिला,नारी, स्त्री असे अनेक नावाने ओळखली जाणारी स्त्री तिला कधी जगात खूपच मान सन्मान दिल्या जातो तर कधी तिला अगदीच वाईट वागणूक दिली जाते हे आताचच नाही तर हे पूर्वीपासूनच चालत आलय ,पण काळ बदलला सावित्रीबार्इ फुले, रमाबार्इ रानडे, आनंदीबार्इ गोपाळ या सारख्या महिला समाज सुधारकांनी पुढारकार घेउन स्त्रीला तिच्या चूल आणि मूल या जगातून बाहेर काढले. शिक्षण देऊन तिच्या हक्कांची जाणीव करून दिली. तिच्यात परिवर्तन घडवून आणले. त्यांनी केलेल्या महिला शिक्षण चळवळीचा स्त्रियांना फायदा झाला आणि महिला कर्तुत्ववान व कर्तबगार झाल्या. पण आता स्त्री शिकली,पूढे चालली तरी ही समाजात तिला म्हणावा तसा वाव मिळत नाही,का? हाच माझा खूप मोठा प्रश्न आहे का तर ती स्त्री आहे म्हणून पुरुष हा शक्तीशाली असतो,त्याला समाजात स्त्रिया पेक्षा जास्त वाव आहे म्हणून, पण सगळेच पुरुष परिपूर्ण नसतात जसे स्त्रिया घरातले, बाहेरचे दोन्ही काम,आपला संसार ,मुलबाळ सांभाळून करू शकतात तसे सगळे पुरुष नाही करू शकत तरीही स्त्री ही कमजोर आहे असे समजल्या जातं,अरे तुम्ही तिला प्रोत्साहन द्या,तिला पुढे जाऊ द्याल तर अबला स्त्री सुद्धा सबला होऊ शकते,पूर्वीच्या काळी सावित्री बाई फुले,झांशी ची राणी या पण स्त्रियाच होत्या पण त्यांनी पण पुढे होऊन बरेच कर्तृत्ववान कामे केलीत ना इतकी उदाहरणं डोळ्यासमोर असताना सुद्धा अजूनही या कलीयुगात स्त्री ला कमजोर समजल्या जातं, मला असे म्हणायचे नाही की तिला सन्मान दिल्या जात नाही,मग मी आता बऱ्याचदा social media वर बघते तर प्रत्येक वेळेला स्त्री वरून जोक्स आणि काही वाईट गोष्टी लिहिल्या जातात बरेचदा स्त्रियांचे फोटो अपलोड केले जातात की,स्त्री च्या हातात मोबाईल फोन असतो मुलगा खिशात असतो किंवा असे काहीतरी वायफळ पोस्ट टाकून स्त्री ला कमी लेखल्या जातं म्हणजे तिचं हस केलं जातं ती सतत wtsap आणि मोबाईल वर असते असे दाखवल्या जातं, म्हणजे स्त्रियांनी social media चा वापर करणे गुन्हा आहे काय?हं पण मी हे पण म्हणींन की त्याचा ज्यादा अतिरेक पण नको,पुरुष तर ह्याच्या दुप्पट इंटरनेट चा वापर करतात सतत wtsap, fb वर असतात मग त्यांनी त्याचा ज्यादा उपयोग करणे चांगले काय? कित्येकदा मी ऐकते बायकांची कुजबुज चाललेली असते अगं हे घरी आले की, ना सतत मोबाइल घेऊन असतात,जेवताना सुद्धा मोबाईल हातात असतो मग हे चालतं काय? अरे घरी आल्यावर तरी निदान आपल्या बायका पोरांना वेळ द्या त्यांच्या शी मनमोकळं बोला जर तुम्ही असं केलत तर बायका मुलं काय करतील मग घरात सगळे मोबाइल घेऊनच बसतील कुणाचा कूणाशी संवाद प्रकारचं राहणार नाही ,तसेच ह्या पण गोष्टी बऱ्याचदा वाचायला मिळतात की, घरात खूप अपमानास्पद वागणूक मिळते,नवऱ्याचं कुठेतरी बायको मुलं असताना सुद्धा बाहेर दुसऱ्या बाई बरोबर अफेअर असतं, असे वागून त्यांना काय मिळणार असतं नुसता संसार उध्वस्त करणे बाकी काही नाही.मग बायका म्हणतात की मुलांकडे बघून चूप बसावं लागतं पण का म्हणजे माणसाने काही केले तरी स्त्री ने मूग गिळून चुपचाप बसायचे, का तर पुन्हा तोच प्रश्न ती एक स्त्री आहे म्हणून पण मग जी त्या पुरुषाला आपल्या नादी लावते ती पण तर एक स्त्रीच असते ना,मग तिला नाही कळत काय की, आपण कुणाचा तरी संसार उध्वस्त करतोय ते,ती एक मालिका असचं एक कथानक असलेली झी मराठी वर सुरू आहे "माझ्या नवऱ्याची बायको" अश्या मूर्खा सारख्या सिरीयल काढून अजून पुरुषांना जोर चढतो, आता तर कहरच झाला आहे बघितले ना ते "बिग बॉस" मधले प्रकरण किती shameful,तसेच नौकरी करणाऱ्या स्त्रियांना खूप मान मिळतो घरात, का तर ती पैसे आणते कमवून म्हणुन,मग जर एखादी स्त्री नौकरी नसेल करत तर तिला काहीच किंमत नाही काय,अरे घर सांभाळणे सुद्धा एक मोठी जबाबदारी च आहे ना अहो,एक साधी गृहिणी जरी ऑफिस ला जाऊन पैसे कमवत नसली ना तरी ती उत्तम प्रकारे घर खर्चाचे नियोजन करत असते,एखादया महिन्यात कमी पैसे असले तरी घरात ती कोणाला काही कमी पडू देत नाही,तिला कधीच कमी लेखू नका कारण तुमच्या घरातली खरी अर्थमंत्री एक गृहिणीच असते.आणि ती सगळे यशस्वी पणे पार पाडतेच की, मग तिला कमी दर्जा का दिला जातो,तसेच काही मैत्रीणीं कडून हेही ऐकायला मिळाले की आता या social media, wtssp मूळे वगैरे जुने शाळेचे ग्रुप्स वगैरे तयार केले जातात त्यातून पुन्हा जुने मित्र मैत्रिणी एकत्र येतात तर त्यातही भेदभाव होतो म्हणजे नवऱ्याने त्याचा ग्रुप किंवा त्याच्या मैत्रिणी शी संपर्क ठेवायचा पण तोच जर बायको अर्थात स्त्री चा ग्रुप असेल तर तो मात्र नवऱ्याला अर्थात पुरुषाला पटत नाही का तर ती तुमची बायको आहे म्हणून,मग ती तुमची मैत्रीण पण कुणाची तरी बायको,आई,सून,मुलगी असेलच ना आणि तीच गोष्ट त्या स्त्री ला सुद्धा लागू होते जुन्या ओळखी असतात मान्य ना पण त्या पुरुषाचं सुद्धा लग्न झालेलं असतं मग तो पण कुणाचा तरी नवरा,बाबा,जावई,मुलगा असतोच ना मग असा भेदभाव का केल्या जातो,अजूनही स्त्रीच स्त्रीला समजून घेऊ शकली नाही आहे, काल परवाच facebook वर एक माहेर चा कट्टा नावाचा ग्रुप आहे त्यावर एकीने प्रश्न विचारला होता की कोणा कोणाला सासूबाई आवडतात तर त्यावर बऱ्याच मुलींनी नकारार्थी उत्तर दिलीत का तर सासू बाई मुलीला सगळं विचारून करतात,मुलीला घरात जास्त भाव असतो सुनेला विचारले जात नाही मग असं का केल्या जातं अहो ती आलेली सून पण तर कुणाची तरी मुलगीच असते ना तुमच्या मुलीला तुम्ही तिच्या सासरी पाठवलीत ना मग तिच्या घरी तिला किती लुडबुड करायची ती करू देत ना,पण तुमच्या घरात तुमची सून आल्यावर तिला सोबत घेऊन तिलाच आपली मुलगी मानून चला ना,बघा बरं घरात किती आनंद असेल तर,म्हणजे सुनेने पण सासूबाईला आई सारखं पाहावं आणि सासूबाईंने देखील सुनेला मुलींसारखं पाहावं,मुलाने सुनेच ऐकलं की तो बायकोच्या म्हणण्यात आहे असे मुलांच्या आईचे म्हणणे असते मग तेच मुलीचा नवरा सगळं ऐकत असेल तर माझा जावई ना खूपच चांगला आहे हो,तो ना माझ्या मुलीचे सगळे ऐकतो आणि इथेच तर तुमचा बायकानं मध्ये किती भेदभाव होतो ते दिसतं.आताच चंद्रपूरला मध्ये मुली विकण्याऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला आणि एकूण काटाचं आला कारण त्या मुलींना विकणाऱ्या सुद्धा स्त्रियाच होत्या म्हणजे बघा ना स्वतः त्या स्त्रिया असून त्यांनी त्या मुळीच दुःख समजून घ्यायला हवे होते ना कोवळ्या कोवळ्या मुलींना त्यांच्या वयापेक्षा 10 ते 15 वर्ष मोठ्या असणाऱ्या व्यक्तीला लग्न करण्यासाठी विकतात बरं इतक्यावरच थांबतात काय हे लोक नाही लग्न करून त्या माणसाची भूक शांत झाली की त्याच मुलीला दुसऱ्या व्यक्तीला विकल्या जायचे किती तो किळसवाणा प्रकार म्हणजे त्या मुलीला एखाद्या बाईला आपल्या मनातलं बोलून दाखवावं असे वाटलेयी असेल कदाचित पण इथे विकणाऱ्याच स्त्रिया होत्या मग त्या स्त्रियांनी त्या मुलीचं दुःख समजायला नको होते काय पैशासाठी स्त्रीच स्त्री ला विसरते.
कधी कधी खरंच असं वाटतं की,स्त्रीच स्त्री च दुःख समजून घेत नाही.आता मी सासू सुनेचे उदाहरण दिलेच आहे पण असेच ज्या "विधवा" स्त्रिया असतात त्यांच्या बाबतीत पण बरेचदा वाईट अनुभव बघायला मिळतात. म्हणजे नवरा स्वर्गवासी झाला की,त्या बाईला कुठेच म्हणजे सवाष्ण बाईला जे करू दिल्या जातं ते तिला करू दिल्या जात नाही. तिने काळीच टिकली किंवा कुंकू लावायचे लाल टिकली किंवा कुंकू लावायचा नाही असा पूर्वी समज असायचा,तिने हिरव्या बांगड्या,मंगळसूत्र पण घालता येत नाही अशी आणि बरीच बंधन त्यांच्यावर येतात,पण असे का?हा माझा सगळ्याच स्त्रियांना प्रश्न आहे.अरे, त्या स्त्रीचा काय दोष जर तिच्या नवऱ्याचं निधन झाले असेल तर, कारण त्या व्यक्तीचे आयुष्यचं तेवढं असेल तर ती स्त्री तरी काय करू शकते तीची त्यात काय चूक ना! म्हणजे विधवा होणं गुन्हा आहे काय हो?ज्या स्त्री चा नवरा तिला सोडून स्वर्गवासी होतो तेच तर किती मोठं दुःख असतं त्या बाईला आणि त्यात हा समाज असे बंधनं घालून अजून तिचं मन दुखवतो.मग अशावेळेला स्त्री नेच स्त्री ला समजून घ्यायला हवे ना?मग का तिला समजून घेतल्या जात नाही खुप वाईट वाटतं सगळे बघितले की,असं आपल्या समाजात घडायला नको कारण स्त्रिया ह्या तरुण वयात ही विधवा होतात आणि आपण तर आता बघतोच आहे स्त्री एकटी दिसली की, कसे स्त्रियांचे लचके तोडल्या जातात आणि ह्या जगात एकटी स्त्री म्हटलं की,हजार वाईट नजरा तिच्या कडे बघतचं असतात मग अश्या वेळेला त्या विधवा स्त्री ने लाल कुंकू लावले,गळ्यात मंगळसूत्र घातले तर काय वाईट आहे हो,ती तिच्या बचावासाठी इतकं तर करूच शकते ना, शकुन अपशकुन हे सगळं थोतांड असतं हो, अहो आता आपण २१ व्या शतकात जगतोयं तर आतातरी आपले विचार बदलायला हवेत.आज प्रत्येक स्त्री पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करते आहे स्त्री ही पुरुषांप्रमाणे सगळी कामे करू शकते.आत्ताचच उदाहरण घ्या ना, लेफ्टिनेंट जनरल माधुरी कानिटकर ही देशाची तीसरी महिला लेफ्टिनेंट जनरल बनली आहे किती अभिमानाची बाब आहे स्त्रियांकरिता आणि त्यांचे पति राजीव पण लेफ्टिनेंट जनरल पदावर आहेत हे असे पाहिल्यांदा झाले आहे की,पति पत्नी दोघेही ३ स्टार होल्ड करणारे लेफ्टिनेंट जनरल पदावर आहेत.सुनीता विलियम सारखी स्त्री चंद्रावर जाऊन येते तरी आपला समाज मात्र मागासलेलाच आहे.
अहो जग इतक पुढे चाललंय मग अजूनही स्त्री ला का समजून घेतलं जात नाही,तिच्या मनाचा विचार का केला जात नाही,हो कारण एकच ती एक स्त्री आहे म्हणून, नका हो असा अत्याचार करू तसं म्हटलं तर काही ठिकाणी म्हणजे साधारण आणि गरीब घरांमध्ये स्त्री वर अत्याचार होतो पुरुष मारतो वैगरे तर ते दिसून पडतं पण उचभ्रू कुटुंबा मध्ये मानसिक रित्या छळ होतो पण ते बाहेर दिसून पडत नाही अशाप्रकारे समाज अजूनही पूर्णपणे पुढे गेलेला नाही,माझा म्हणणं इतकचं आहे की, स्त्रीचं मन समजून घ्या , तिला कमी लेखू नका.आणि म्हणूनच पुरुषांप्रमाणे स्त्री ने सुद्धा स्त्रीला समजून घ्यायला हवे कारण वेळ आली तर तीच स्त्री दुर्गा आणि चंडिकेचे रूप घेऊ शकते हेही विसरू नका तिला कमजोर समजू नका.
२१ व्या शतकात देखील समाजात स्त्रीचे स्थान खचितच मोठे आहे व मोठेच राहील यात तीळमात्र शंका नाही.म्हणूनच स्त्री ही महानच असते.
आयुष्याच्या घरट्या मघुनी
जीवनाचे सूर साधते
जगते, जगवीते
प्रेमाचे धागे जुळवीते
म्हणुन मी स्त्री म्हणवली जाते .
सप्तपदीची सात पाऊले
सात वचने विश्वासाची
अंगारून येते मम गृहा
माप ओलांडुनी तुझे माझ्यात
सामावुन घेते
म्हणुन मी स्त्री म्हणवली जाते .
अर्धागिनी, गृहस्वामीनी
कूलवधु, भावी माता
प्रेमाची परिभाषा, विश्वासाची आशा
-हृदयाचे धागे जुळवुनी
बीज उदरी जोपासते
कूलदीपक जीवन आशा तेववीते
म्हणुन मी स्त्री म्हणवली जाते.
सौ. क्षमा बासरकर धर्मपुरीवार
सदस्य, बाल न्याय मंडळ,चंद्रपूर
8484082224
No comments:
Post a Comment