(बालपण - एक फुलपाखरु, इंटरनेट च्या चक्रव्यूहात अडकलेलं)
बालपण म्हणजे स्वछंदी फुलपाखरू,
बालपण म्हणजे निस्वार्थ प्रेम,
बालपण म्हणजे निस्वार्थ हसणं,
बालपण म्हणजे निस्वार्थ जगणं,
बालपण म्हणजे एक सुंदर अनुभूती.
Thank u अवधूत बेटा खरंच तू आज आम्हा(आई-बाबा) दोघांनाही बालपणीची आठवण करून दिलीस.दिवसभर आम्ही व्यस्त असतो त्यामुळे अवधुतला वेळ द्यायला आम्ही ऑफीस मधून घरी आल्यानंतर आणि सुट्टीचे दिवस असतात. तर काल रात्री त्यालाच सुचलं आणि म्हणाला आई बाबा आपण मी सांगेल तसा गेम खेळूया काय?आम्ही म्हटले "कुठला गेम खेळायचा बेटा"तर तो म्हणाला की,आपण आज चित्र काढून बघण्याची स्पर्धा करूया तिघेपण जण, पहिल्यांदा नको वाटले कारण आता किती तरी दिवस झाले असतील चित्र काढणे वगैरे सगळं दूरच राहिलंय पण त्याच्या आनंदासाठी आम्ही दोघेही तयार झालो त्याने आम्हला सांगितले की,आई बाबा मी वेळ देणार त्यावेळेत चित्र काढा कुठलही चित्र काढा तुम्हाला जे वाटतं ते, तोही काढणार होताच आमच्या सोबत चित्र,तो तर आता न शिकताही बऱ्या पैकी एक्सपर्ट झालाय.मग आलो बालपणीच्या आठवणीत आणि सुरुवात केली चित्र काढायला आणि काढले चित्र वेळेत.खूप मस्त वाटले अगदी लहानपणात गेल्या सारखे वाटले.या कोरोना काळात मोठी मंडळी तर कंटाळालीच आहेत पण लहान मुलांना या काळात हँडल करणे म्हणजे जरासं कठीण होऊन बसलंय कारण ह्या कोरोनाने त्यांच बालपणचं हिरावलय,कारण ज्या प्रमाणात मैदानी खेळ त्यांनी खेळायला हवे ते त्यांना मिळतच नाहीये. पूर्वीचे खेळ किती सुदंर असायचे, लगोरी, टिक्कर बिल्ला, पिंकी पिंकी व्हॉट कलर, विटी दांडू मस्त असायचे सगळेच खेळ पण या इंटरनेट ने मुलांना काय मोठ्यांना पण वेडं करून सोडलंय म्हणून मुलामुलींनी outdoor activity सोबत indoor activity साठी कुठले तरी छंद जोपासले तर त्या मोबाईल पासून मुलांना काही काळ का होईना दूर ठेवता येतं अस मला वाटतं.कारण कोरोना काळात मुलांनी बाहेर जाणं जर risky वाटतं. म्हणून indoor activity हवी, नाहीतर तर इतरवेळेला मुलं बाहेर खेळतातच.
खरंच बालपण किती सुंदर असतं नाही काय ! आजकालच्या धावपळीच्या युगात प्रत्येकजण ज्याच्या त्याच्या परी तो व्यस्तच असतो. मग ती मोठी माणसं असोत की लहान मुलं असोत. आणि या इंटरनेट च्या दुनियेत तर जिथे जावे तिथे मग छोटं बाळ का असेना तो रडत असला की, त्याची आई देखील त्याच्या हातात मोबाईल देते आणि काहीतरी लावून दिलं की,ते बाळही लगेच शांत राहतं.मग आता या छोट्या बाळाला काही समजत नसून देखील तो त्या मोबाईल च्या प्रेमात पडतो तर मोठी मंडळी आणि तरुण मुलं तर वेडीच झाली आहेत त्या मोबाईल मुळे. पूर्वी टेलिफोन होता तेव्हा इतकं नव्हतं त्या फोनच वेड कुणालाच.पण हळू हळू मोबाईल ची सुरुवात झाली आणि तो टेलिफोन तर पडद्याआड गेला म्हणायला काहीच हरकत नाही.पण वाईट याचंच वाटतं की,इंटरनेट चे जितके फायदे आहे त्याच्या दुप्पट तोटेही आहेत असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही आणि हो एकदा काय त्या मोबाईल मधल्या गेम ची किंवा इतर apps ची सवय लागली की, मग त्यातून बाहेर निघणे खूपच कठीण आणि अशक्यप्राय बाब आहे.
बालकांच्या क्षेत्रात काम करताना हे मला प्रकर्षाने जाणवले की,मुलं एखाद्या गोष्टीच्या आहारी गेले की,त्या चक्रव्यूहातून बाहेर पडणे खूपच कठीण होऊन जातं आणि मग त्या मुलांना त्या अवस्थेतून बाहेर काढणे म्हणजे मुलांच्या आईवडिलांची देखील तारेवरची कसरतच होत असते.आजची तरुण पोरं ही त्या मोबाईल आणि इंटरनेट च्या इतकी नादी लागलीत की, त्यामुळे बरीच मुलं मुली गुन्हेगारी प्रवृत्तिकडे वळायला लागलेत. शिक्षणाकरिता काही काळ इंटरनेट/ मोबाईल वापरणे वाईट नाही कारण आता ती काळाची गरज झाली आहे असे म्हणायला हरकत नाही पण त्याच्या पलीकडे जाऊन जर त्याचा दुरुपयोग होत असेल तर ते खूप धोकादायक ठरतं आणि त्याचा त्रास त्या मुलाला तर होतोच पण घरची मंडळी देखील त्याच्या त्या कृत्यामुळे त्यांना देखील शरमेने मान खाली घालण्याची वेळ येते.म्हणूनच ८ ते ९ वर्षांपासून प्रत्येकचं आईवडिलांनी आपल्या मुलामुलींसोबत मैत्री चे नाते निर्माण करायला हवे कारण ८ ते १८ वर्ष वय हे मुलामुलींसाठी खूपच महत्वपूर्ण असतं आणि त्यांच्या आई वडीलांसाठी सुध्दा कारण इथे मुलं चुकली की,त्यांना संधी देणं गरजेचं असतं एकदा का, ती हाताबाहेर गेली की,मग मात्र त्यांना समजावणे थोडं कठीण होऊन जातं आणि त्या परिस्थितीतून बाहेर काढायचे असेल तर त्यांना समुपदेशन, प्रेम आणि आपुलकीची अतिशय गरज असते.शहरात तर मोबाईल मुळे मुलांवर परिणाम होतोच आहे पण जर खेड्यातली परिस्थिती बघितली तर ती अजूनच वाईट असते कारण तिथे सगळ्या मुलांजवळ मोबाईल असेलच असे नाही एखादा मुलगा जरा बऱ्या घरचा असेल आणि त्याचा जवळ android मोबाईल असेल तर पूर्ण गावातली मुलं घोळका करून गल्ली बोळात बारीक मध्ये व्हिडिओ पाहत बसलेली असतात. आणि या अश्या व्हिडिओ,सिरिअल्स, मूव्हीस मुळं मुलांचं गुन्हेगारीचं प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चाललयं आणि त्यातूनच चोरीचे तर प्रमाण वाढलेच आहे,का तर आई वडील मोबाईल घेऊन देत नाही, मोबाईल घ्यायचाय म्हणून चोरी केली,कुणी मुलं म्हणतात की,play station ला जाऊन game खेळायची (लत) लागली होती.मुद्दाम (लत)हा शब्द वापरलाय कारण हे सुद्धा एक व्यसनच आहे आणि त्या व्यसनापायी मुलं चोरी करतात एका मुलाला विचारले की, "चोरी क्यु की" तर तो म्हणाला की,"play station मे जाके खेलने की आदत लग गयी थी और घर से पैसे नही मिलते थे इसलीये चोरी की",बघा म्हणजे इतक्या छोट्याश्या कारणासाठी तो मुलगा त्याच्या आहारी गेला आणि चोरी करून बसला काही मुलं मुली घाणेरडे पॉर्न विडिओ वगैरे बघून अशी घाणेरडी पाऊलं उचलतात. आणि अजून एक सांगावंसं वाटतंय की,मुलांकडे लक्ष देणं,त्यांच्याशी मैत्री करून त्यांना बोलतं करणं अत्यंत गरजेचे आहे त्यांना सांगायला हवे की, बेटा प्रत्येक गोष्ट आईबाबाला सांगत जा,खोटं बोलू नका,कुठलीही गोष्ट मनात ठेवू नका कारण आजकालची मुलंमुली बऱ्याच गोष्टी आई वडिलांपासून लपवून ठेवतात आणि मनातल्या मनात ठेवून मग टोकाचे पाऊल उचलून आत्महत्या सारखे कृत्य करतात.आणि पालकांनी पण मुलांकडे आवर्जून लक्ष द्यायला हवे की,मुलगा कोणासोबत खेळतो,कोणासोबत जातो या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींकडे त्यांच्या नकळत का होईना लक्ष असायला हवे आणि मुलामुलींच्या वयापेक्षा मोठ्या मुलामुलींची संगत असायला नको.ती संगत लागली तर काही वाईट संगतीचा सहवासात मुलं केव्हा गुन्हेगारी कडे वळतील काहीच सांगता येत नाही.म्हणूनच मुलांकडे वेळीच लक्ष दिले गेले तर त्यांचे भविष्य तर सुधारेलच भारतालाही सुशिक्षित पिढी लाभेल यात यत्किंचितही शंका नाही.
ऍड.क्षमा आशिष धर्मपुरीवार(बासरकर)
बा. क.स.अध्यक्ष चंद्रपूर.
फो. न.८४८४०८२२२४
खूप छान लिहिलंय 👌 आजच्या युगात पालकांनी मुलांकडे लक्ष देणे फार गरजेच झालं आहे. आणि तितकीच सतर्कता ही बाळगायला हवी.👍
ReplyDeleteThank u😊
ReplyDelete