माझा लेख👇
माणूस अजूनही(क्रूरच) रानटीच (रानटीपणाचा/क्रूरपणाचा कळस)
काल कन्या दिन होता,तीच कन्या जिला आपण लक्ष्मी, सरस्वती, दुर्गेचे रूप मानतो.काल जिकडे तिकडे कन्या दिनाचे स्टेटस दिसत होते.खूप छान वाटले बघून, पूर्वीसारखे आता कन्येला कोणीच कमी लेखत नाही तर तिचं महत्व पूर्वीपेक्षा बरंच वाढलंय पण.......पण एक सल सतत मनात असते की,इतकं जग पुढे चाललंय मग मुली,स्त्रियांचे महत्व वाढलेले असताना सुद्धा तिच्यावरील अत्याचार मात्र काही केल्या कमी का होत नाही.मानव तेव्हाच का रानटी(क्रूर) होतो जेव्हा,की त्याच मुली,स्त्रियांना आपण लक्ष्मी, दुर्गेचे रूप मानतो.
मानव हा पृथ्वीवरील सर्वात हुशार आणि बुद्धिमान प्राणी आहे असे म्हटले जाते. त्याचे कारण म्हणजे इतर प्राण्यांच्या तुलनेत त्याच्या बुद्धीचा झालेला विकास आणि त्याने साधलेली प्रगती. सुरुवातीला इतर प्राण्यांप्रमाणेच राहणाऱ्या माणसाने,काळ बदलत गेला तशी उत्क्रांती साधली की, आता तर तो त्याच्या बुद्धीच्या बळावर परग्रहावर जाऊ लागला आहे.
पण, उत्क्रांत झालेला हा माणूस त्याचा रानटीपणा पूर्णपणे विसरलाय का? काही घटना अशा घडून गेल्या आहेत आणि घडत आहेत ज्या पाहून तुम्हाला असं वाटेल की, माणूस अजून रानटीच(क्रूरच) आहे. हे सगळं ऐकून मन सुन्न नाही तर शरीर आणि मन बधिर व्हायची वेळ आलीये.
किती अश्या निर्भया आणि किती अश्या डॉ प्रियांका आणि अनेक स्त्रिया, मुली अशा अत्याचाराला बळी पडतील आणि पुढेही हे असे होत राहील,स्त्री केव्हा सुरक्षित होईल??
खरंच एक एक घटना कानावर पडल्या की, अंगावर अगदी काटा येतो मग जे भोगत आहे किंवा ज्यांचं भोगून किंवा सहन करून झालंय त्याला काय म्हणू आपण.किती किळसवाणे प्रकार सुरू आहेत म्हणजे मुलगी असणे म्हणून हसावे की, असे प्रकार घडतात म्हणून रडावे अशी परिस्थिती झालीये.
म्हणजे स्त्री ही पूर्वीपासून सुरक्षित नव्हतीच आणि ती आताही नाहीच आहे,काय हो स्त्रीनेच असा काय गुन्हा केलाय? की,तिच्या नशिबी हे असले भोग भोगायला लागतात. म्हणजे आता मुलीने जन्माला येणेही गुन्हाच म्हणावा लागेल आणि त्याच स्त्रीने मुलींना जन्माला घालणेही गुन्हाच झालंय काय?कारण आपल्याच देशात आपल्याच मुली सुरक्षित नाहीत, पूर्वी स्त्रीने मुलीला जन्माला घातले की, घरचे लोक सतत तिला टोमणे मारत असत पण आता या सगळ्या विकृती बघितल्या की,शरीर मन बधिर होतं आणि नको वाटतं सगळं आणि म्हणूनच म्हणावेसे वाटते,
"बंदिनी स्त्री ही बंदिनी"
"हृदययी पान्हा नयनी पाणी, जन्मोजन्मीची कहाणी"
मतिमंद मुलीवर अमानुष बलात्कार,एखाद्या मुलीवर सामूहिक बलात्कार,एखाद्या मुलीला एकतर्फी प्रेमातून जिवंत जाळून टाकलं जातं तर कोणावर ऍसिड फेकलं जातं या आणि अशा अनेक बातम्या एकाच दिवशी आपल्या कानावर पडल्या तर नक्कीच आपल्याला प्रश्न पडेल की, आजच्या युगात महिलांच नक्की स्थान काय ? आज स्त्रिया कुठच्या ही क्षेत्रात मागे नाही मग महिलांबरोबर अत्याचार कमी न होता वाढत का चाललेत?
पुराणकलापासून स्त्रीला अनन्यसाधारण महत्त्व दिलं गेलंय, स्त्रीची अनेक रूप अनादि कालपासून चालत आलीत, मुलगी, पत्नी, माता, मैत्रिण, सुन, सासू, आजी या अनेक नात्यांमधे ती गुंतलीय. एकच स्त्री मधे अनेक नाती स्थानापन्न झालेली दिसतात, पण एका नात्याची दुसऱ्या नात्याशी सरमिसळ झालेली नसते. प्रत्येक नात्याची एक घट्ट विण विणलेली असते, ती कधीच सुटत नाही, पण याच स्त्रीला समाजकडून अबला, अन्याय सहन करणारी ही विशेषणं दिली जातात, इतिहासा मधे सुध्दा स्त्रियांची अनेक कर्तुत्व आपल्याला वाचायला मिळतात, झाशीची राणी, जिजाऊ यासारखी उदाहरणं आपल्या डोळ्यासमोर उभी राहतात ते स्त्रीयांमधील कर्तुत्व, धैर्य, राजकारणातील डावपेच खेळण्यात ही आजच्या महिला मागे नाहीत पण तरीही मुलगी जन्माला आली की,आजही सुस्कारे टाकले जातात, स्त्री भ्रूण हत्या होते मुलीला जन्म देणाऱ्या मातेच्या मनात ही पहिला प्रश्न हाच येतो की मुलगा झाला असता तर ? मग ती जन्म देणारी स्त्री आपण ही एक स्त्रीच आहोत हे अलगद विसरते, नातेवाईका च्या डोक्यावर मुलीच ओझं होतं, जन्म झाल्याबरोबर सुरुवात होते ती स्त्रीच्या समाजातील स्थानाला, मुलगी जस-जशी मोठी होत जाते तसंतसे मुलीचे पालक चिंताग्रस्त होत जातात, त्यात त्या मुलीला जर भाऊ असेल तर त्या दोघांमधे फरक केला जातो, मुलीने मुलीसारखाच वागलं पाहिजे हे तिच्या निरागस मनावर बिंबवल जातं, काही काही पालक आपल्या मुलींना मुलींच्याच शाळेत किंवा कॉलेज मधे पाठवणं पसंत करतात, मर्दानी खेळात एकादी मुलगी किती ही तरबेज असली तरी तिला मुला प्रमाणेच प्रोत्साहन मिळतेच असं नाही, मुलींना खेळायला भातुकलीची खेळनीच दिली जातात तिच्या हातात कोणी क्रिकेट ची बॅट नाही ठेवत. लहानपणापासून मुलींना बाळकडू दिलं जाते.पण तरीही आता जग बदललंय पण स्त्रियांवरील अत्याचार काही थांबण्याचे प्रकार कमीच होत नाही आहे.
किती तरी यातना स्त्री सहन करतेच आहे,मागील कित्येक वर्षांपासून अश्या अत्याचाराच्या घटना सतत कानावर पडतातच आहे.पण दिल्ली च्या निर्भया केस पासून बलात्काराच्या केस बद्दल जास्त पडसाद उमटायला लागलेत. म्हणजे सकाळी घरातून निघण्यापासून तर कामावरून रात्री घरी येईपर्यंत स्त्री ही सुरक्षित नाहीच.त्या निर्भया च्या मनात साधा विचारही आला नसेल की, तिच्या सोबत असे काही होऊ शकेल म्हणून बिचारी तिचा काय दोष होता पण अश्या वासनांध नराधमांच्या हाती ती सापडली आणि त्या कुत्र्यांनी तिचे लचके तोडले पण तिने हिंमतीने सगळ्या यातना सहन करत मृत्यूशी झुंज दिली पण अखेर तिची हिम्मत तुटली आणि ती गेली!दुसरी लक्षात राहण्यासारखी केस म्हणजे डॉ. प्रियांका रेड्डी.डॉ. प्रियांका रेड्डी सोबत झाले ती पण अशीच घटना घडली त्या डॉ. मुलीचा काय दोष ती बिचारी काम आटोपून आपल्या घरी जायला निघाली होती.पण समाजाच्या घाणेरड्या नजरा आणि कलुषित वृत्ती स्त्री ला जगूच देत नाही आणि आधी पासून नजर ठेवुन असलेल्या त्या नराधमांनी आपली भूक भागवून तिला जाळून देखील टाकले पण त्या नराधमांचे थोडे सुद्धा मन पिघळले नाही की,त्या नराधमांना सुद्धा आई, बहीण,मुलगी, बायको असेलच ना, पण असे करताना त्यांना काही सुद्धा वाटले नसेल काय?किती निष्ठुर असतात काही लोक आणि स्त्री ला पुरुषांनी कसे खेळणं केलंय याची जाणीव झाली,मी असे म्हणणार नाही की, सगळेच पुरुष वाईट असतात आज आपल्या शिवाजी महाराजांच्या देशात काही चांगले लोक पण अजूनही आहेतच.पण अश्या घटना वरचेवर सुरूच होत्या.
आताचीच ताजी घटना घडली ती म्हणजे साकीनाका येथील ती महिला गणपती उत्सवाकरिता आपल्या बहिणीकडे जायला निघाली होती पण तिच्या मनात असे विदारक काही तिच्या सोबत होईल अशी पुसटशी कल्पना देखील आली नसेल पण त्या नराधमाने आपली वासना तर पूर्ण केलीच पण तिचे लचके तोडायचे पण सोडले नाही,ही एक घटना घडून १०/१२ दिवस होत नाही तोच दुसरी घटना कानावर पडली ती म्हणजे डोंबिवली मधली घटना. बघा ना मुलं प्रेमाच्या नावाखाली मुलींना जाळ्यात ओढतात आणि आजकाल व्हिडिओ काढणे म्हणजे नवलच नाही राहिले आहे पण त्या व्हिडिओ च्या नावाखाली त्या अल्पवयीन मुलीला ब्लॅकमेल करून एक नाही दोन नाही तब्बल ३० जणांनी तिच्यावर बलात्कार केला असे बातम्यांमध्ये सांगत होते. किती तो रानटी पणा इतकी तळपायाची आग मस्तक गेली ऐकून म्हणजे विकृती इतक्या खालच्या दर्जाला गेलीये शीssss खूपच वाईट वाटलं.पूर्वी लोकांना मुली नको असायच्या पण आता प्रत्येकाच्या तोंडून ऐकायला मिळतं की, एक तरी मुलगी असायला हवी,मुलगी असणं भाग्याचे समजले जाते पण तिला जन्माला घातल्यावर ती सुरक्षित नसेल आणि तिच्या सोबत असे प्रकार घडणार असतील तर मग काहीच नको वाटतं. किती दिवस मुली अश्या असुरक्षित राहतील,म्हणजे मुली आज शिकून सवरून सुद्धा त्यांच्या नशिबात हे असले घाणेरडे प्रकार होतच आहेत.
मग खरंच कायद्याचे ज्ञान असले तरी एखादेवेळी असं वाटतं की,अशा रानटी, नराधम, वासनांध लोकांना भरचौकात गोळ्या घातल्या पाहिजे नाही तर जाळून टाकायला हवे.
अरे मोठ्या मुली सोडा पण लहान मुली आणि म्हाताऱ्या बायकांना सुद्धा हे असले वासनांध लोक सोडत नाही,तेव्हा डोकं अजून सटकतं.
"भय इथले संपत नाही"
आई वडिलांनी मुलांवर कितीही चांगले संस्कार केले तरी आजकाल मुलं एकमेकांच्या संगतीत राहून बिघडत चालले आहेत आणि इंटरनेट, मोबाईल मुळे मुलांवर वाईट परिणाम होत चालले आहेत मोबाईल, इंटरनेट चे जितके फायदे आहेत त्याच्या दुप्पट तोटेही आहेत.आणि त्यामुळे अश्या किती निष्पाप निर्भया, प्रियांका यांचे बळी जातील काही सांगता येत नाही.पुढे अजून किती निर्भया होणार कोणास ठाऊक. म्हणून सरकारने याकरता ठोस पावले उचलायला हवी आणि अश्या नराधमांना कठोरातली कठोर शिक्षा व्हायला हवी.तेव्हाच तिला खरी श्रद्धांजली अर्पण केल्यासारखी होईल.
तसेच मी अजून एक म्हणेन की,आता वेळ आली आहे की,स्त्रीने अबला न राहता सबला व्हायला हवे नाहीतर अश्या किती डॉ प्रियंका आणि निर्भया पुढे होतील सांगता येणार नाही.आणि म्हणून मुलींना शाळेत सक्तीने कराटे हा खेळ compulsary करायला हवा जेणेकरून त्या अश्या प्रवृत्तीना सामोरे जाताना कुठलेही भय तिच्या मनात राहणार नाही.
कोई भी समाज तभी तरक्की करता है जब तक वहा की नारिया सशक्त होती है ,यदि नारी सुरक्षित है तभी हमारा भविष्य भी सुरक्षित है,
अपमान मत करो नारियो का,
इनके बल पर जग चलता हैं,
पुरुष जन्म लेकर तो.....
इनही की गोद मे तो पलता है।
सौ.क्षमा आशिष धर्मपुरीवार(बासरकर)
सदस्य, बाल न्याय मंडळ, चंद्रपूर
No comments:
Post a Comment