बेटीया तो बेटीया होती हैं l
सगळ्यांना राष्ट्रीय बालिका दिनाच्या खूप खूप शुभेच्छा 💐
असे म्हणतात की, ज्या घरात मुलींचा जन्म होतो, त्या घरात सौभाग्यही जन्माला येते.होय,त्यांच्यामुळेच घरात चमक येते, ही म्हण मुलींसाठी प्रसिद्धचं आहे. आजकाल डॉ. हे त्या गर्भवती महिलांच्या पतींना विचारतात तेव्हा ते मुलीची इच्छा व्यक्त करतात. वास्तविक, मुली एकाच वेळी अनेक जबाबदाऱ्या हाताळण्यास सक्षम असतात. तेही मुलांपेक्षा जास्त भावनिक असतात. खरंच, आईसाठी जगातील सर्वात मोठा दिवस असतो जेव्हा ती मुलीला जन्म देते. गेल्या अनेक वर्षांपासून जगभरात कन्या दिवस (बेटी दिवस) म्हणून वेगवेगळे दिवस साजरे केले जात आहेत. मुली न सांगता प्रत्येक भावना समजून घेतात. मुलींचे कौतुक करण्यासाठी, तुम्ही तिला कुठल्याही माध्यमातून तिचे कौतुक करू शकता.
मुलीचा जन्म ही ईश्वराची देणगी असते, असे म्हणतात. आणि त्या सुदैवाने मिळतात. पण अनेक कुटुंबे इतकी दुर्दैवी आहेत की, जिथे मुलींना ओझं समजलं जातं.आणि काही ठिकाणी मुलींना जन्मापूर्वीच मारलं जातं. पण ज्यांना मुली नाहीत, त्यांना कोणीतरी त्यांचे महत्त्व विचारावे.
एखादी मुलगी तुमच्या मांडीत बसू शकणार नाही इतकी मोठी असू शकते पण ती तुमच्या हृदयात बसू शकणार नाही इतकी मोठी कधीच असू शकत नाही.कोण म्हणतं मुलींना दोन हृदयं नसतात, नवऱ्याच्या उंबरठ्यावर बसलेल्या बापाच्या मुलीला विचारा.मुली खूप भावूक असतात, त्यांचे हृदय खूप कोमल असते. ती उत्कट तसेच दृढनिश्चयी असते, अशा परिस्थितीत, प्रत्येक आईचे कर्तव्य आहे की,त्यांनी आपल्या मुलींना नेहमीच प्रेरणा द्यावी जेणेकरून त्या निर्भयपणे आणि समजूतदारपणे जीवनातील अडचणींचा सामना करू शकतील. हे काम तुम्ही तुमच्या मुलीवर छानशी चारोळी लिहून, मुलीवर काही सुंदर ओळी लिहून, तिच्यासोबत शेअर करू शकता, जेणेकरून तिच्या प्रोत्साहनात कोणतीही कमतरता राहू नये. आई आणि मुलीचं नातं खूप खास असतं,आणि बाबांची ते ती परीच असते.
मुलीला जन्म दिल्याने स्त्रीच्या कुशीत एक निष्पाप मूलच येत नाही, तर एक लहान मुलगी, उद्याची स्त्री आणि तिच्या भूतकाळाचा संघर्ष आणि भविष्याची स्वप्ने आणि आशा असतात. मुलांपेक्षा मुलींमध्ये एक गुण जास्त असतो असे विज्ञानही मानते. मुलगे एक घर चालवतात, मुली दोन घरांना स्वर्ग बनवतात. मुलगी ही अशी व्यक्ती आहे जिच्यासोबत तुम्ही हसता, स्वप्न पाहता आणि मनापासून प्रेम करता. एक पिता जोपर्यंत त्याच्या सर्वात महत्वाच्या निर्मितीचे म्हणजेच त्याच्या मुलीचे यश पाहत नाही तोपर्यंत तो अपूर्ण असतो. जिथे माणुसकी मरते तिथे मुलींचा गर्भातच गळा दाबला जातो. मुलीचा जन्म थांबवू नका, मुलगी वाचवा, मुलीला शिक्षित करा, तिचा जन्म साजरा करा. समाजाला शिक्षित करायचं असेल तर आधी मुलींना शिक्षित करा.ती शिक्षित झाली तर तिची पुढची पिढी शिक्षित होईल म्हणून शिक्षण आवश्यक आहे. पूर्वीच्या काळी जसे व्हायचे तसे आता सर्रास बालविवाह होण्यास सुरुवात झालीय पण हे कुठेतरी थांबायला हवे नाहीतर आपला देश कुठे चाललाय याचा नेमचं नाही.अशी भारताची तरुण पिढी भरकटत गेली तर देशाचे भविष्य काय राहील.म्हणूनच
बेटीया तो बेटीया होती हैं l हर मां-बाप की जान होती हैं l
लक्ष्मी का वरदान होती हैं बेटीयां, सरस्वती का मान होती हैं बेटीयां, धरती पर भगवान हैं बेटीयां l
जरूरी नहीं रौशनी चिरागों से ही हो, बेटीयां भी घरो में उजाला करती हैं।
बेटीयों को जैसे संस्कार मिलेंगे, वैसे ही समाज का निर्माण होगा
घर में रहते हुए ग़ैरों की तरह होती हैं बेटीयां, धान के पौधों की तरह होती हैं बेटीया l
लाख गुलाब लगा लो तुम अपने आंगन में, जीवन में खुशबू तो बेटीया ही लाती हैं l
पराया होकर भी कभी पराई नही होती बेटीया शायद इसलिए कभी पिता से हंसकर बेटीयो की बिदाई नही होती।
एक मीठी सी मुस्कान हैं बेटीया यह सच है कि मेहमान हैं बेटीया, उस घर की पहचान बनने चली जिस घर से अनजान हैं बेटीया।
बेटीयो की हर ख्वाहिश पूरी नहीं होती, फिर भी बेटीया कभी भी अधूरी नहीं होती।
बेटियां सब के मुक़द्दर में कहां होती हैं, घर खुदा को जो पसंद आये वहां होती हैं बेटीया।
विज्ञान भी मानता है कि बेटीयों में बेटों से एक गुण ज्यादा होता है।
बेटे तो एक घर चलाते हैं, बेटीयां तो दो-दो घरों को स्वर्ग बनाती हैं।
इसीलिये
बेटीया तो बेटीया होती हैं l हर मां-बाप की जान होती हैं
ॲड क्षमा बासरकर - धर्मपुरीवार
बाल कल्याण समिती अध्यक्ष चंद्रपूर
8484082224
No comments:
Post a Comment