माणसाने माणसाशी माणसासम वागणे
माणूस,माणूस म्हटला की, त्यासोबत स्वार्थ हा शब्द part and parcel असतोच नाही काय?माणसाने किती स्वार्थी असायला हवे याची पण काही मर्यादा असायला हवी.काही जण या जगात निःस्वार्थी पण आहेत हो.पण खरंच आजची परिस्थिती बघितली की, चीड येते खूप,तळपायाची आग मस्तकात जाते.
व्यक्तीला/माणसाला व्यक्ती स्वातंत्र्य आहे म्हणून त्यांच्या मनाला येईल तसे बोललेच पाहिजे जरुरी नाही ना पण नाही "शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणची भीती" असेच वागतात काही लोक.समाज माध्यमांवर तर इतक्या पोस्ट येत असतात की, असं वाटतं सडेतोड उत्तर द्यावे त्यांच्या बोलण्यावर पण काय शेवटी तेच ना की,आपल्यात आणि त्यांच्यात काय फरक राहिला मग.अरे पूर्वीचे लोक वाईट वागले म्हणून त्याची शिक्षा ज्याच्यापरी तो समाज भोगतच आहे की,पण आता कुठे तसं राहिलंय समाज बदलला व्यक्तीच्या भावना आणि वागणूक बदलली तरीही व्यक्ती मधला तिढा काही केल्या सुटत नाही.का माणूसच माणसाच्या जीवावर उठलेला दिसतो अरे स्वतःच्या स्वार्थापोटी आणखी किती स्वार्थी व्हाल.
आता पर्यंत हिंदू मुस्लिम वाद चालायचा तो जगमान्यच आहे.तो वाद विकोपाला गेलेला आहे आणि तो तिढा कधी सुटणार देवच जाणे पण आता हिंदू हिंदू सुद्धा भांडायला लागलेत किती ती घाणेरडी वृत्ती झाली आहे लोकांची,अरे कधी माणसं माणसांना समजून घेतील.प्रत्येक जण आपल्या लढ्यासाठी लढतोच त्यात काही नवल आहे काय पण मला म्हणायचंय की,स्वतः लढताना दुसऱ्या समाजावर चिखल फेकण्यापेक्षा तुमचे लढण्याचे ध्येय काय हे बघायला हवे.सत्ता,मानसन्मान हवा असला की, कुठल्याश्या पक्षाचा आधार घेऊन सगळा उपभोग घ्यायचा बरं एवढ्यावर माणूस थांबतो काय,त्याची भूक कुठे क्षमलेली असते त्याची भूक अजून वाढलेली असते,पण जेव्हा भूक वाढल्यावर काहीच मिळत नाही तेव्हा व्यक्ती दुसऱ्याला दोष द्यायला पण कमी जास्त बघत नाही काही महान लोक तर अक्षरशः एका proper समाजाची जात काढायला मागे पुढे बघत नाही, मग आता कोण जातीयवाद पसरवतो आहे आणि का म्हणून, अरे तुम्हाला तुमचा हक्क मिळत नाही म्हणून तुम्ही एखाद्या जातीला किती बदनाम करण्याचा प्रयत्न कराल किती नीच आणि घाणेरडी वृत्ती झाली आहे माणसाची,त्यात राजकीय पक्षाला पण ओढल्या जातं.
आपला तो बाब्या, दुसऱ्याचं ते कार्ट अशी म्हण मराठीत प्रचलित आहे.हीच म्हण सध्या हिंदू समाजामध्ये मराठी मराठी लोकांमध्ये घडून येताना दिसतंय.अरे प्रत्येकाचेच हक्काची लढाई ही असतेच ना लढा ना कोण नाही म्हणतंय पण दुसऱ्यावर चिखलफेक न करता लढा म्हणावं. म्हणूनच म्हणावं वाटतं माणसाने माणसाशी माणसासम वागणे.
ऍड. क्षमा आ.बासरकर- धर्मपुरीवार.
सदस्य, बाल न्याय मंडळ, चंद्रपूर.
फोन न.८४८४०८२२२४
No comments:
Post a Comment